शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

एक घास ‘भुकेल्यांसाठी’ : वाशिमच्या युवकांनी चालविला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:23 IST

रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते.

नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक कार्य करण्याची ओढ असली की, कोण काय कार्य करेल सांगता येत नाही. असाच काहीसा उपक्रम तिरुपती सिटीमधील युवकांनी चालविला आहे. भुकेलेल्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जावून पोटभर जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे आता ज्यांची एक दिवस जेवणाची व्यवस्था झाली ते ही मोठया आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहेत.गत सहा महिन्यापूर्वी तिरुपती सिटीमधील काही युवक, नागरिक छोटेखानी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असता काही तरी सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार केला. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अखेर दर रविवारी घरोघरी ताजे अन्न तयार करुन ते एकत्र करुन भुकेलेल्यांना देण्याचा उपक्रमावर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार या युवकांचा असलेला व्हॉटस अ‍ॅप गृपवर मॅसेज टाकला जातो. विशेष म्हणजे रविवारी काय मेनू राहणार याची सूचना सुध्दा गृपमध्ये टाकून दिल्या जाते. या रविवारी पुरी व भाजी बनवून एकत्र करायचा मॅसेज पडल्याबरोबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिराजवळ ते एकत्रित केली जाते. त्यानंतर आॅटोमध्ये हे अन्न घेवून बसस्थानक, रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते. त्यानंतरही अन्न शिल्लक राहिल्यास अनाथालय, आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये देवून एक चांगले कार्य हाती घेण्यात आले आहे.तिरुपती सिटी युवक मंडळांना हा उपक्रम करण्याची प्रेरणा जे मिळाली ते एका कार्यक्रमातूनच. एका कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणात अन्न शिल्लक राहिल्याने ते न फेकून देता ते गोरगरिबांमध्ये वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे युवक परिसरात अन्न वाटपासाठी गेले असता अनेक जण धावून आले. हे पाहून दर रविवारी हा उपक्रम आपण राबविल्यास अन्नदान ही होईल आणि गोरगरिबांच्या पोटाची खळगी सुध्दा भरेल. त्यामुळे हा निर्णय गत ४ ते ५ महिन्यापूर्वी घेण्यात आला. यामध्ये कोणताही खंड न पडता सतत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची ज्यांना दर रविवारी अन्न मिळते ते आतुरतेने आपली भांडे घेवून या युवकांची प्रतिक्षा करतांना दिसून येतात. तिरुपती युवक मंडळांनी सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग व सहकार्य मिळत आहे. गृपवर मॅसेज पडल्याबरोबर युवकांकडून घरी आजचा मेनू कळविण्यात येतो. त्यानुसार महिला वेळेच्या आत ते तयार करुन ठेवतात. युवकांनी सुरु केलेला हा उपक्रम खरोखरचं कौतूकास्पद आहे. ज्यावेळी गोरगरिब, भुकेले या युवकांकडून अन्न घेतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या युवकांबाबत कृतज्ञता दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक