शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एक घास ‘भुकेल्यांसाठी’ : वाशिमच्या युवकांनी चालविला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:23 IST

रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते.

नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक कार्य करण्याची ओढ असली की, कोण काय कार्य करेल सांगता येत नाही. असाच काहीसा उपक्रम तिरुपती सिटीमधील युवकांनी चालविला आहे. भुकेलेल्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जावून पोटभर जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे आता ज्यांची एक दिवस जेवणाची व्यवस्था झाली ते ही मोठया आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहेत.गत सहा महिन्यापूर्वी तिरुपती सिटीमधील काही युवक, नागरिक छोटेखानी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असता काही तरी सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार केला. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अखेर दर रविवारी घरोघरी ताजे अन्न तयार करुन ते एकत्र करुन भुकेलेल्यांना देण्याचा उपक्रमावर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार या युवकांचा असलेला व्हॉटस अ‍ॅप गृपवर मॅसेज टाकला जातो. विशेष म्हणजे रविवारी काय मेनू राहणार याची सूचना सुध्दा गृपमध्ये टाकून दिल्या जाते. या रविवारी पुरी व भाजी बनवून एकत्र करायचा मॅसेज पडल्याबरोबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिराजवळ ते एकत्रित केली जाते. त्यानंतर आॅटोमध्ये हे अन्न घेवून बसस्थानक, रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते. त्यानंतरही अन्न शिल्लक राहिल्यास अनाथालय, आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये देवून एक चांगले कार्य हाती घेण्यात आले आहे.तिरुपती सिटी युवक मंडळांना हा उपक्रम करण्याची प्रेरणा जे मिळाली ते एका कार्यक्रमातूनच. एका कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणात अन्न शिल्लक राहिल्याने ते न फेकून देता ते गोरगरिबांमध्ये वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे युवक परिसरात अन्न वाटपासाठी गेले असता अनेक जण धावून आले. हे पाहून दर रविवारी हा उपक्रम आपण राबविल्यास अन्नदान ही होईल आणि गोरगरिबांच्या पोटाची खळगी सुध्दा भरेल. त्यामुळे हा निर्णय गत ४ ते ५ महिन्यापूर्वी घेण्यात आला. यामध्ये कोणताही खंड न पडता सतत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची ज्यांना दर रविवारी अन्न मिळते ते आतुरतेने आपली भांडे घेवून या युवकांची प्रतिक्षा करतांना दिसून येतात. तिरुपती युवक मंडळांनी सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग व सहकार्य मिळत आहे. गृपवर मॅसेज पडल्याबरोबर युवकांकडून घरी आजचा मेनू कळविण्यात येतो. त्यानुसार महिला वेळेच्या आत ते तयार करुन ठेवतात. युवकांनी सुरु केलेला हा उपक्रम खरोखरचं कौतूकास्पद आहे. ज्यावेळी गोरगरिब, भुकेले या युवकांकडून अन्न घेतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या युवकांबाबत कृतज्ञता दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक