शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग, लाखोंचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 15:24 IST

मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देमानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले.आगीचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मानोरा (वाशिम) - मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या भायजी नगर येथे आगामी खरीप हंगामापूर्वी शेत मशागतीची कामे करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शेतातील धुरे पेटवून दिले. त्याचा मोठा भडका होऊन परिसरात एकमेकांना लागून असलेली घरे आगीच्या कवेत सापडली. त्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. यादरम्यान दिग्रस, मंगरूळपीर, कारंजा येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांमध्ये देवानंद शामराव वाघमारे, गजानन चंपत सोनोने, अरूण सुखदेव पखमोडे, अरूण विश्वनाथ कांबळे, गुलाब मोरकर, सुरेखा गजानन सोनोने, महादेव बापुराव कुडबे, शामराव बिरम, मिसनकर, अशोक उत्तम कोल्हे आदिंच्या घरांचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच मानोराचे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी एस.बी. जाधव, तलाठी एम.के. खंडारे, के.व्ही. फटकवढाकरे, पी.बी. आचार, एस.डी. शेजोड, एम.एम. रणखांब यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

रिसोड तालुक्यातील रिठद येथे याआधी 7 एप्रिलच्या रात्री सहा घरांना आग लागल्याने 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील चार ते पाच घरे जळाली. घराला आग लागल्याचे निदर्शनात येताच, घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  माधव आरू यांच्या घरातील सोयाबीन, हरबऱ्यासह 55 हजारांची रक्कम जळून खाक झाली होती. माधव आरू यांच्या शेजारी असलेले तुकाराम आरू, विश्वनाथ आरू, कुंडलिक आरू यांच्यासह अन्य एक ते दोन जणांच्या घराला आग लागली. या आगीत जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. 

 

टॅग्स :fireआगwashimवाशिम