शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मालेगावात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 24, 2015 02:00 IST

नियोजनाची गरज; काटेपूर्णा प्रकल्पाच्या जल पातळीत घट.

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा धरणाचा पाणीसाठा संपत आल्याने शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात योग्य नियोजन न केल्यास शहरात पाणी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालेगाव शहराच्या आसपास कुरळा, कोल्ही व केळी अशी लहान मोठी धरणे आहेत. धरणांमधील कमी जलसाठा लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी घेण्याला मनाई आहे. तथापि, या प्रकल्पावरुन काही शेतकरी शेतीसाठी पाणी घेत असल्यामुळे एप्रिल महिन्यातच मालेगावकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही धरणे शहराच्या जवळपास असल्याने त्या जवळच्या भागातील विहिरी, बोअरला चांगले पाणी असते; मात्र अखेरच्या टप्प्यात ते पाणी आटल्याने जवळच्या विहिरी बोअरसुध्दा आटतात. मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असल्याने आता जास्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरळा धरणावरुन येणारी पाणी थेट पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मालेगाव शहरात यापूर्वी चवथ्या दिवशी धरणातून पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर पाण्याची पातळी खाली गेल्याने आठव्या दिवसावर पाणीपुरवठा गेला. आता पाणी गढूळ असल्याने २0 ते २५ दिवस होऊनही पाणी आले नाही. त्यामुळे मालेगावकर त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी विविध ठिकाणी भटकंती सुरु आहे. बरेच नागरिक टँकरने पाणी विकत घेत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करणे गरजेचे आहे.