शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

मालेगावात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 24, 2015 02:00 IST

नियोजनाची गरज; काटेपूर्णा प्रकल्पाच्या जल पातळीत घट.

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा धरणाचा पाणीसाठा संपत आल्याने शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात योग्य नियोजन न केल्यास शहरात पाणी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालेगाव शहराच्या आसपास कुरळा, कोल्ही व केळी अशी लहान मोठी धरणे आहेत. धरणांमधील कमी जलसाठा लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी घेण्याला मनाई आहे. तथापि, या प्रकल्पावरुन काही शेतकरी शेतीसाठी पाणी घेत असल्यामुळे एप्रिल महिन्यातच मालेगावकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही धरणे शहराच्या जवळपास असल्याने त्या जवळच्या भागातील विहिरी, बोअरला चांगले पाणी असते; मात्र अखेरच्या टप्प्यात ते पाणी आटल्याने जवळच्या विहिरी बोअरसुध्दा आटतात. मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असल्याने आता जास्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरळा धरणावरुन येणारी पाणी थेट पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मालेगाव शहरात यापूर्वी चवथ्या दिवशी धरणातून पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर पाण्याची पातळी खाली गेल्याने आठव्या दिवसावर पाणीपुरवठा गेला. आता पाणी गढूळ असल्याने २0 ते २५ दिवस होऊनही पाणी आले नाही. त्यामुळे मालेगावकर त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी विविध ठिकाणी भटकंती सुरु आहे. बरेच नागरिक टँकरने पाणी विकत घेत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करणे गरजेचे आहे.