शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

'सीमेवरील शहीद जवान सुनील धोपेंसोबत घातपात, फोन करुन वर्तवला होता धोका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 20:32 IST

कुटुंबीयांचा आरोप: सुनील धोपे यांनी फोन करून वर्तविला होता धोका

कारंजा लाड (वाशिम) : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत कारंजा येथील रहिवासी जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा मृत्यू नसून, घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत १६ सप्टेंबर रोजी कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे.

कर्तव्याच्या ठिकाणी कार्यरत असताना सुनील धोपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सहकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी आढळून आले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती १५ सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून धोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले जाणार असून, अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती कारंजाचे ठाणेदार राजेंद्र बोडखे यांनी दिली. गत १९ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा आप्त परिवार आहे. १६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह आम आदमी पार्टीचे यवतमाळ संघटक वसंत ढोके, तहसीलदार आर.बी. भोसले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत धोपे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला. सुनील धोपे यांनी १४ सप्टेंबर रोजी फोन करून आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकाºयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर धोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी तक्रार देत सविस्तर चौकशीची मागणी केली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, मनसेचे पदाधिकारी अमोल लुलेकर यांच्यासह शेकडो जणांची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली होती.मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन१६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह मान्यवरांनी धोपे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पाटणी यांनी जवान धोपे यांच्या भावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार गंभीर असून, याची निश्चितपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन धोपे कुटुंबीयांना दिले.बॉक्स.. 

१७ सप्टेंबरला कारंजा बंदजवान सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होण्याकरिता सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी कारंजा बंदचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :MartyrशहीदSoldierसैनिकwashimवाशिम