शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:24 IST

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे. परिणामी, ओट्याखाली शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करताना शेतमालाची नासाडी होते. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटवा, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली असतानाही अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्याअंतर्गत जवळपास १० ठिकाणी उपबाजार समित्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांसह संचालकांनीदेखील यापूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने व्यापाºयांचा शेतमाल हटविला होता. आता पुन्हा ओट्यांवर व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात आहे. याविरोधात रिसोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी आवाज उठविला आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल न हटविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हीच परिस्थित अन्य बाजार समितीतही असल्याने ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व संचालक पुढे येत आहेत. ...तर टाळता येईल नासाडीओट्यांवर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवून तेथे हर्रासी केली जाते. ओट्याखाली शेतमाल टाकताना दोन ते तीन किलोदरम्यान शेतमालाची नासाडी होते. याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. ओट्यावर हर्रासी झाली तर शेतमालाची नासाडी होणार नाही. अवकाळी पाऊस आला तर ओट्याखालील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते, याचा अनुभव यापूर्वी शेतकºयांना आला आहे. त्यामुळे ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविणे आवश्यक ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था केली जाते. या ओट्यांवर शेतकºयांचा शेतमाल ठेवणे आवश्यक आहे. या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात असेल तर याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या जातील. व्यापाºयांनीदेखील ओट्यावर शेतमाल ठेवू नये.रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

 ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यासंदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल राहत असल्याने शेतकºयांची गैरसोय होते, असा या निवेदनाचा आशय आहे. या विषयावर चर्चा झाली असून, लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी