शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:24 IST

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे. परिणामी, ओट्याखाली शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करताना शेतमालाची नासाडी होते. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटवा, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली असतानाही अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्याअंतर्गत जवळपास १० ठिकाणी उपबाजार समित्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांसह संचालकांनीदेखील यापूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने व्यापाºयांचा शेतमाल हटविला होता. आता पुन्हा ओट्यांवर व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात आहे. याविरोधात रिसोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी आवाज उठविला आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल न हटविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हीच परिस्थित अन्य बाजार समितीतही असल्याने ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व संचालक पुढे येत आहेत. ...तर टाळता येईल नासाडीओट्यांवर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवून तेथे हर्रासी केली जाते. ओट्याखाली शेतमाल टाकताना दोन ते तीन किलोदरम्यान शेतमालाची नासाडी होते. याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. ओट्यावर हर्रासी झाली तर शेतमालाची नासाडी होणार नाही. अवकाळी पाऊस आला तर ओट्याखालील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते, याचा अनुभव यापूर्वी शेतकºयांना आला आहे. त्यामुळे ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविणे आवश्यक ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था केली जाते. या ओट्यांवर शेतकºयांचा शेतमाल ठेवणे आवश्यक आहे. या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात असेल तर याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या जातील. व्यापाºयांनीदेखील ओट्यावर शेतमाल ठेवू नये.रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

 ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यासंदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल राहत असल्याने शेतकºयांची गैरसोय होते, असा या निवेदनाचा आशय आहे. या विषयावर चर्चा झाली असून, लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी