शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली बाजार समित्या बंद!

By admin | Updated: March 31, 2017 02:28 IST

शेतकरी अडचणीत; बहुतेक ठिकाणी ५ एप्रिलपासून होणार खरेदी

वाशिम, दि. ३0- विविध नैसर्गिक संकटे, बाजारातील दराची घसरण आदी अनेक अडचणींचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत असतानाच मार्च एण्डिंगच्या ताळेबंदासाठी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याने जिल्हाभरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यात आर्थिक वर्षे संपत असल्याने वर्षभराच्या खात्याची जुळवाजुळव करण्यासाठी व्यापार्‍यांची धडपड सुरू असते. एक एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत बहुतेक सर्वच आर्थिक व्यवहार केले जातात. ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. शासकीय, निमशासकीय, व्यापारी, उद्योजक, सार्‍यांचीच ह्यमार्च क्लोजिंगसाठी धडपड सुरू आहे. आपले सर्व व्यवहार पूर्ण करून नव्या वर्षातील नव्या व्यवहाराची तयारी प्रत्येकाकडून केली जाते. व्यापारी उद्योजकांनाही मावळत्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जुळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील व्यापारी मार्च एण्डिंगच्या कामात गुंतले असून, याच कारणामुळे त्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याची मागणी बाजार समित्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील मालेगाव वगळता बहुतेक सर्वच बाजार समित्यांमधील खरेदी बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून तर काही ठिकाणी मागील दोन दिवसांपासून शेतमालाच्या खरेदीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी वर्गाची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. वाशिम येथील बाजार समितीमधील खरेदी बुधवार, २९ मार्चपासून बंद करण्यात आली असून, येत्या ५ एप्रिलपर्यंत येथील व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले, तर कारंजा येथील बाजार समिती आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार, २८ मार्च रोजी घेण्यात आला. रिसोड येथील बाजार समितीचे व्यवहारही मार्च एण्डिंगसाठी बंद ठेवण्यात आले असून, मंगरुळपीर येथील बाजार समिती मागील चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. येथील व्यवहारही ६ एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार आहेत. आता व्यापार्‍यांनी त्यांच्या ताळेबंदासाठी बाजार समित्यांकडे खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी केली असल्याने बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे.मार्च एण्डिंगमुळे ताळेबंद जुळविण्यासाठी वेळ लागणार असल्याने खरेदीवर लक्ष देता येणार नाही, तसेच खरेदीसाठी बँकांकडून पुरेसा पैसाही मिळत नसल्याने व्यापार्‍यांनी बाजार समित्या सोमवारपर्यंत बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीमधील खरेदी बंद ठेवण्यात आली आहे- नीलेश भाकरे सचिव, बाजार समिती, कारंजा मार्च एण्डिंगच्या काळात दरवर्षीच बाजार समित्या बंद ठेवण्यात येतात. यंदाही ताळेबंद जुळविण्यासाठी बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली होती. त्यानुसार बाजार समिती बंद ठेवली आहे. तथापि, शेतकर्‍यांना याबाबत पूर्वीच सूचना देण्यात आली होती.- बबन इंगळेसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिमचिल्लर व्यापार्‍यांची चांदीबाजार समित्यांमध्ये लिलावात क मी अधिक दर मिळतील; परंतु आता बाजार समित्या बंद असल्याने गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना चिल्लर व्यापार्‍यांकडे मिळेल, त्या दरात शेतमाल विकावा लागत आहे. रस्त्यावर फडी लावून शेतमाल खरेदी करणार्‍यांची यामुळे मोठी चांदी झाली आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांकडून दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने ते तुरीची खरेदी करीत आहेत. शेतकरी मात्र नुकसान होत असतानाही अडचणीपोटी या व्यापार्‍यांकडे निमुटपणे माल मोजून देण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत