शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:50 IST

पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. कधीकधी दिवसभर हा वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही. यामुळेच मान्सून पूर्व (प्री-मान्सून) विस्कळीत झालेल्या वीज तारा, वीज खांबासह इतर प्रकारची दुरुस्ती करण्याचे नियोजन महावितरणच्यावतीने करण्यात येते. यंदाही हे नियोजन केले आहे; परंतु पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, आॅईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्याची छाटणी, भूमिगत वीजवाहिनी टाकणे, जुन्या फिडर पिलरमध्ये ‘इन्सूलेशन स्प्रे’ मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाºया परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. महावितरण वाशिम अंतर्गत या कामांचे शेड््यूल तयार असून, पावसाळा तोंडावर आला आहे. या कामांचे कंत्राट विभागीयस्तरावरून निविदा काढण्यात येतात. तथापि, जिल्ह्यात अद्यापही बहुतांश ठिकाणी कामांना प्रारंभ झालेला नाही. संभाव्य अपघाताची भिती लक्षात घेता. महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.कामांची निविदा प्रक्रिया संथगतीनेवाशिम जिल्ह्यात पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन आणि अहवाल तयार आहे. आता या कामांची निविदा प्रक्रिया विभागीय स्तरावरून करण्यात येते. तथापि, पावसाळा तोंडावर आला असताना बहुतांश कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. अनेक प्रस्ताव अद्याप वाशिम येथील महावितरणच्या कायालयात सादर करण्यात आले असतानाही निविदा प्रक्रियेचे काम संथगतीने सुरू आहे. निविदा प्रक्रियाच संथ असल्याने कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.वीजखांब कोसळल्याने ६ गावांचा वीज पुरवठा खंडीतमहावितरणच्यावतीने मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांबाबत गांभिर्य घेण्यात आले नाही. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड गाव परिसरात सोमवार ४ जूनच्या रात्री आलेल्या वादळी वाºयामुळे ८ ते १० वीज खांब कोसळून ६ गावांतील तब्बल दोन दिवस वीज पुरवठा खंडीत झाला. यातील काही गावांचा वीज पुरवठा गुरुवार ६ जूनपर्यंतही सुरळीत होऊ शकला नाही. त्याशिवाय मान्सूनपूर्व पावसामुळे कारंजा शहरातही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यातही झाडांवरील वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला सुदैवाने यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.

मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे जिल्ह्यातील अत्यावश्यक भागांत प्राधान्याने करण्यात येत आहेत. कंत्राटदार कंपन्यांना या संदर्भात गांभिर्य बाळगण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होणार आहेत.- आर.जे. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम