शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:50 IST

पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. कधीकधी दिवसभर हा वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही. यामुळेच मान्सून पूर्व (प्री-मान्सून) विस्कळीत झालेल्या वीज तारा, वीज खांबासह इतर प्रकारची दुरुस्ती करण्याचे नियोजन महावितरणच्यावतीने करण्यात येते. यंदाही हे नियोजन केले आहे; परंतु पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, आॅईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्याची छाटणी, भूमिगत वीजवाहिनी टाकणे, जुन्या फिडर पिलरमध्ये ‘इन्सूलेशन स्प्रे’ मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाºया परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. महावितरण वाशिम अंतर्गत या कामांचे शेड््यूल तयार असून, पावसाळा तोंडावर आला आहे. या कामांचे कंत्राट विभागीयस्तरावरून निविदा काढण्यात येतात. तथापि, जिल्ह्यात अद्यापही बहुतांश ठिकाणी कामांना प्रारंभ झालेला नाही. संभाव्य अपघाताची भिती लक्षात घेता. महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.कामांची निविदा प्रक्रिया संथगतीनेवाशिम जिल्ह्यात पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन आणि अहवाल तयार आहे. आता या कामांची निविदा प्रक्रिया विभागीय स्तरावरून करण्यात येते. तथापि, पावसाळा तोंडावर आला असताना बहुतांश कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. अनेक प्रस्ताव अद्याप वाशिम येथील महावितरणच्या कायालयात सादर करण्यात आले असतानाही निविदा प्रक्रियेचे काम संथगतीने सुरू आहे. निविदा प्रक्रियाच संथ असल्याने कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.वीजखांब कोसळल्याने ६ गावांचा वीज पुरवठा खंडीतमहावितरणच्यावतीने मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांबाबत गांभिर्य घेण्यात आले नाही. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड गाव परिसरात सोमवार ४ जूनच्या रात्री आलेल्या वादळी वाºयामुळे ८ ते १० वीज खांब कोसळून ६ गावांतील तब्बल दोन दिवस वीज पुरवठा खंडीत झाला. यातील काही गावांचा वीज पुरवठा गुरुवार ६ जूनपर्यंतही सुरळीत होऊ शकला नाही. त्याशिवाय मान्सूनपूर्व पावसामुळे कारंजा शहरातही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यातही झाडांवरील वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला सुदैवाने यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.

मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे जिल्ह्यातील अत्यावश्यक भागांत प्राधान्याने करण्यात येत आहेत. कंत्राटदार कंपन्यांना या संदर्भात गांभिर्य बाळगण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होणार आहेत.- आर.जे. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम