शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : वाशिम जिल्ह्यात ६0 टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:22 IST

आता २४ आॅक्टोबर रोजीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील १०५२ मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५६.६५ टक्के अर्थात पाच लाख ४३ हजार ३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, तिन्ही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले असून, रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. एकूण ४४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले असून, आता २४ आॅक्टोबर रोजीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागून आहे.वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन मतदारसंघात एकूण ४४ उमेदवार निवडणुकीत मैदानात होते. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातून १६, वाशिम १३ आणि कारंजा मतदारसंघातील १५ उमेदवारांचा समावेश होता. जिल्ह्यात ५ लाख ४५२ पुरूष, चार लाख ५८ हजार ९० महिला व अन्य १० असे एकूण ९ लाख ५८ हजार ५५१ मतदार आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघातील ३३१, वाशिम ३६९ व कारंजा मतदारसंघातील ३५२ मतदान केंद्रांवर सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. काही ठिकाणी तूरळक पाऊस पडल्याने मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले नाहीत. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ५.७३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये रिसोड ५.५९ टक्के, वाशिम ६.१५ आणि कारंजा मतदारसंघातील ५.६१ टक्केवारीचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ५८ हजार ५५१ पैकी ५ लाख ४३ हजार ३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ लाख ८५ हजार ३६५ पुरूष तर २ लाख ५७ हजार ६६६ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी ५७.०२ तर महिला मतदारांची टक्केवारी ५६.२५ अशी आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघात तीन लाख ८ हजार ३७८ पैकी एक लाख ८२ हजार ५३ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५९.०४ अशी येते. यामध्ये ९३ हजार ४८३ पुरूष व ८८ हजार ५७० महिला मतदारांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात तीन लाख ४८ हजार ७४९ पैकी १ लाख ९२ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ५५.३४ अशी येते. यामध्ये १ लाख तीन हजार ८७२ पुरूष व ८९ हजार ११९ महिला मतदारांचा समावेश आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक हजार ४२४ पैकी एक लाख ६७ हजार ९८७ मतदारांनी मतदान केले असून, याची टक्केवारी ५५.७३ अशी येते. यामध्ये ८८ हजार १० पुरूष व ७९ हजार ९७७ महिला मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिनही मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. त्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी समोर येईल.दरम्यान, जिल्ह्यातील पाच लाख ५७ हजार मतदारांनी कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला घरात बसवायचे याचा फैसला मतदानातून केला आहे. २४ आॅक्टोबरला मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

मतदारांचा गोंधळकाही ठिकाणी मतदार यादीत नाव दिसत नसल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तीन ते चार ठिकाणी काही वेळेसाठी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदारांना दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागली. पावसामुळेदेखील मतदारांची गैरसोय झाली. ग्रामीण भागात अनेक मतदान केंद्रासमोर मंडप टाकलेला नव्हता. त्याचा फटका पावसादरम्यान मतदारांना बसला.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karanja-acकरंजाwashim-acवाशिमrisod-acरिसोड