शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:54 IST

वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांवर आधारीत भागांत पाणीटंचाईचे सावट दाट झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू पाटबंधारे व बॅरेजेस मिळून एकूण १३४ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत ३४ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, त्यातील तीनपैकी दोन मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. उर्वरित १३१ प्रकल्पांचा विचार करता ३० टक्क्यांहून कमी उपयुक्त साठा उरला असून, यातील बहुतांश प्रकल्पांवर सिंचन आणि पाणी पुरवठा योजनाही राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र यंदा वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा उपसाही वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील ९, रिसोड तालुक्यातील ८, मंगरुळपीर तालुक्यातील ३, तर मालेगाव, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यातील बहुतांश प्रकल्प सिंचनासाठी असल्याने शेतकºयांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणाºया प्रकल्पांची स्थिती गंभीर होत असल्याने जिल्हावासियांना प्रामुख्याने ग्रामीण भागांतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण