शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:54 IST

वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांवर आधारीत भागांत पाणीटंचाईचे सावट दाट झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू पाटबंधारे व बॅरेजेस मिळून एकूण १३४ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत ३४ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, त्यातील तीनपैकी दोन मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. उर्वरित १३१ प्रकल्पांचा विचार करता ३० टक्क्यांहून कमी उपयुक्त साठा उरला असून, यातील बहुतांश प्रकल्पांवर सिंचन आणि पाणी पुरवठा योजनाही राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र यंदा वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा उपसाही वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील ९, रिसोड तालुक्यातील ८, मंगरुळपीर तालुक्यातील ३, तर मालेगाव, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यातील बहुतांश प्रकल्प सिंचनासाठी असल्याने शेतकºयांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणाºया प्रकल्पांची स्थिती गंभीर होत असल्याने जिल्हावासियांना प्रामुख्याने ग्रामीण भागांतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण