शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Lok Sabha Election 2019 : पाळणाघरामुळे महिला मतदारांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले.लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली.

वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे. मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास फायदा झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मतदानादरम्यान उन्हात ताटकळत उभे राहणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये, मतदान यादी पाहताना अडचणी येऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदि सुविधा असतानाच महिला मतदारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघराचीही सुविधा दिली. महिला मतदारांना या पाळणाघरात मुले ठेवून मतदान करणे सोपे झाले. या पाळणाघरात आशा सेविकांनी मुले सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे महिलांच्या मतांचा टक्का वाढण्यासही मदत झाल्याचे दिसून आले.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwashimवाशिम