शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Lok Sabha Election 2019 : पाळणाघरामुळे महिला मतदारांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे.मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले.लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली.

वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे. मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास फायदा झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मतदानादरम्यान उन्हात ताटकळत उभे राहणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये, मतदान यादी पाहताना अडचणी येऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदि सुविधा असतानाच महिला मतदारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघराचीही सुविधा दिली. महिला मतदारांना या पाळणाघरात मुले ठेवून मतदान करणे सोपे झाले. या पाळणाघरात आशा सेविकांनी मुले सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे महिलांच्या मतांचा टक्का वाढण्यासही मदत झाल्याचे दिसून आले.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwashimवाशिम