शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:41 IST

वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. पीककर्ज वाटपातील दिरंगाई, पीकविम्यातील दिरंगाई, पीक नुकसानाच्या अनुदान वाटपातील दिरंगाई, यातील कोणत्याच मुद्यावर उमेदवारांचा फोकस दिसत नाही.लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विविध ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले असून, वाहनांसह थेट मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत. या प्रचारादरम्यान अद्यापही सार्वजनिक सभा किंवा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला नसून, कुठल्याही उमेदवाराने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ऐकिवात नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी बोंडअळी अशा समस्यांनी पुरता वैतागला असल्याने शेतकºयाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच डबघाईची झाली आहे. त्यातच या विविध नैसर्गिक संकटापोटी शासनाकडून शेतकºयांना मदत देण्यातही प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या दोन वर्षात नाफे डच्या खरेदीत शेतकºयांची प्रचंड हेळसांड झाली. शेतमाल नोंदणी आणि मोजणीस विलंब, शेतमालाच्या चुकाºयास विलंब, बाजार व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक आदि प्रकार आहेतच शिवाय नैसर्गिक आपत्तीपासून होणाºया नुकसानासाठी सुरक्षाकवच म्हणून काढलेल्या पीकविम्याचा फायदाही शेतकºयांना झाला नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी रास्तारोको आंदोलनही केले; परंतु काहीच फायदा झाला नाही. ही स्थिती असतानाही उमेदवारांच्या प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा मुद्यावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी