शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:13 IST

बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशात ‘लॉकडाऊन’ आहे. मार्च ते जून या दरम्यान रसवंत्या बंद राहिल्याने तसेच बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शासनाने आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे १८ जुलै रोजी केली.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मार्च ते मे या महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतरही रसवंती अन्य लघु व्यवसायांना मुभा मिळाली नाही.  रिसोड तालुक्यात जवळपास १६४ एकर क्षेत्रावर लिंबू शेती आहे. दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसात लिंबूला बऱ्यापैकी मागणी असते. रसवंतीवाले अगोदरपासूनच लिंबूची मागणी नोंदवितात. शरबत व अन्य कारणांसाठीदेखील लिंबूची खरेदी होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ऐन हंगामात रसवंत्या बंद होत्या. त्यामुळे लिंबूची मागणीही आपसूकच घटली. व्यापाºयांकडून लिंबूचा उठावही झाला नाही. काही शेतकºयांनी स्वत: भाजीबाजारात लिंबूची विक्री केली. परंतू, बाजारभाव समाधानकारक मिळाला नाही. लिंबूची मागणी नसल्याने काही ठिकाणी लिंबूची फळे ही झाडालाच सडल्याची माहिती शेतकरी बबनराव मोरे यांनी दिली. झाडाला भरपूर प्रमाणात लिंबू लागले; परंतु मागणी नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते. 

सहा वर्षांपूर्वी तीन एकर शेतात लिंबूची लागवड केली. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न होते. यावर्षी कोरोनामुळे लिंबूला मागणी नाही तसेच बाजारपेठही नव्हती. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.-बबनराव मोरे, लिंबू उत्पादक शेतकरी, निजामपूर

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमagricultureशेतीRisodरिसोड