शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेच्या ताळेबंदाची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 15:52 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार वाशिम जिल्हयात किती शेतकरी पात्र ठरलीत आणि नेमकी किती कर्जमाफी होईल, याचा हिशोब जुळविण्याची लगबग प्रशासनाकडून सुरु झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय समितीची बैठक घेण्यात येणार असून, १५ दिवसात आॅडिट पूर्ण केले जाणार आहे.राज्यभरातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ची घोषणा विधानसभेत केली. या योजनेअंतगर्गत ज्या शेतकºयांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदती पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम २ लाखांपर्यंत आहे. अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदती कर्जात रुपांतरीत केलेल्या किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम २ लाखांपर्यंत असल्यास त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदती पीक कर्ज व अल्पमुदती पीक कर्जाचे केलेले पुनर्गठीत, फेर पुनर्गठीत कर्ज यांची ३० सप्टेंबर २०१९ रोजी वैयक्तीक शेतकºयांच्या सर्व कर्जखात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रती शेतकरी कमाल २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती गोळा करण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीची बैठक सोमवार, ३० डिसेंबर रोजी आयोजित केली असून, या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट करून तसा अहवाल विभागीय समितीमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांची यादी गोळा करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, बैठकीनंतर १५ दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्याचे आॅडिट केले जाईल.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक तथा सचिवजिल्हास्तर समिती, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी