शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याची कारणे लेखी स्वरूपात कळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:30 IST

ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सन चालू वर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ९३ हजार ८९० शेतकरी सभासदांना १५३० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत सद्या केवळ ३१ हजार १३६ शेतकरी सभासदांना २५७ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्याची टक्केवारी जेमतेम १६.८२ आहे. तथापि, ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील कुठलाच शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची बँकांनी दक्षता घेण्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकºयांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे; मात्र बँका याकामी सहकार्य करित नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीत आहेत. ही बाब गंभीर असून संबंधित बँकांनी सामाजिक बांधीलकीतून शेतकºयांपर्यंत पोहचावे व पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या बँकांच्या शाखांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यापुढे दर सोमवारी त्यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. बँकांच्या ११७ शाखांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट सोपविण्यात आलेल्या बँकांमध्ये अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एकूण ११७ शाखांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक