शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यावर आक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 3:45 PM

एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात एनएच-१६१ या राष्टÑीय महामार्गासाठी मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. आता या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असताना जमिनीच्या हक्कासह इतर काहीबाबतीत हरकती व आक्षेप दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाला या प्रकरणांच्या सुनावणीत न्यायनिवाडा करूनच शेतकºयांना मोबदला वितरीत करता येणार आहे. एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या एनएच-१६१ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील शेतकºयांच्या २५१ हेक्टर जमिन संपादनाचे काम महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाने सुरुवातीला शेतकºयांच्या जमिनीबाबत हरकती, दावे मागितले, तसेच जमिनीशी संबंधित सर्वच व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेतले. त्यामुळे भुसंपादन प्रक्रिया पार पडली आणि जमिनीच्या मुल्यांकनानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भुसंपादनाच्या मोबदल्यात शेतकºयांना ३४६ कोटीचे वितरण करावे लागणार असून,आजवर १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. तथापि, शेतकºयांना जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विविध गावांतून या प्रक्रियेबाबत हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आले आहेत.आधीच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसह इतर तांत्रिक कारणांमुळेही यात खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकºयात निराशेचे वातावरण होते. आता मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरळीत होत असताना आक्षेप आणि हरकती दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.आक्षेपाचे स्वरूप वेगवेगळेराष्ट्रीय महामार्ग एनएच-१६१ साठी करण्यात आलेल्या भुसंपादनानंतर मोबदला देण्याबाबत दाखल हरकती आणि आक्षेपांचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यात काही जमिनींचे प्रकरण न्याय प्रविष्ट असणे, ताबा आणि वहिवाटीत फरक असणे, गट व नकाशात फरक असणे आदिंसह काही प्रकरणांत घरगुती वाद असल्याने जमिनीचा मोबदला अदा करण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. आता या सर्व प्रकरणांवर उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयात सुनावणी होऊन न्यायनिवाडा झाल्यानंतरच मोबदला अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून, यात न्याय निवाडा न झाल्यास प्रकरण न्यायालयातही दाखल करता येणार आहे.

मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील ३२ गावात एनएच-१६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. आता या जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असताना १२ गावातून विविध प्रकारचे आक्षेप आणि हरकती दाखल करून मोबदल्यावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनावणीनंतरच मोबदला देण्याचा निर्णय होणार आहे.- प्रकाश राऊतउपविभागीय अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग