शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

पुलांचा अभाव; गावकऱ्यांची पाण्यातून वाटचाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:27 AM

पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पूल, रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ...

पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पूल, रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी जमीन समांतर असलेल्या नदी, नाल्यांवर पुलाची निर्मिती नाही. मानोरा तालुक्यातील चाकूर - गव्हा रस्त्यावरील पूलही जमीन समांतर आहे. सोमवारी रात्रीच्या पावसामुळे पूर आला असून, चाकूर गावातील नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे पाण्यातून वाटचाल करावी लागत आहे. एकमेकांच्या हातात हात घालून नागरिकांना रस्ता ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या ग्रामीण रस्त्यावरील नाल्यावरही पूल नाही. या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती ओढवते. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

००००

बांधकाम विभागाने लक्ष द्यावे !

पावसाळ्याच्या दिवसांत पुलांअभावी काही गावांचा संपर्क तुटतो. पर्यायी रस्ता नसल्याने जमीन समांतर असलेल्या नदी, नाल्यांच्या पाण्यातून मार्गक्रमण करीत अनेक नागरिक धोका पत्करतात. हा धोका कधी जीवावरही बेतू शकतो. गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात संततधार पाऊस असल्याने नदी, नाले ओसांडून वाहत आहेत.