शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:40 IST

वाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

ठळक मुद्देखरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली.यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीसाठी १ लाख १ हजार ४६ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पुरेशे बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४४ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून कृषी विभागाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात खतही उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके आता चांगलीच बहरली असल्याचे दिसून येते. यावर्षीदेखील सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्याखालोखाल तूरीचा पेरा राहणार आहे.कळंबा  महाली परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली आहेत. या परिसरात दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.१५ जूनपूर्वी झालेल्या पावसाने या परिसरात पेरण्यांस सुरुवात झाली. २० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या आटोपल्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा समाधानकारक पाऊस झाल्याने  पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे या परिसरातील सर्वच पिकांत डवरणी करण्यात आली. कळंबा महाली येथील पूस नदीला पूरही आला होता. त्यामुळे परिसरातील गाव तलाव, विहीरी व बोअरवेल्सला पाणी आले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी