शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

खैरखेड्यातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:02 IST

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे.

- यशवंत हिवराळेराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे पशुपालकांनी आपली जनावरे जंगलात मोकाट सोडली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.डोंगरावळ व खडकाळ भागात वसलेल्या खैरखेडा येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गावकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांची उपजिविका ही शेतीवरील कामावर आधारीत आहे. शेतीसिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे संपल्यानंतर रोजगारासाठी गावकºयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात गावातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून, दूरवरून नदीपात्रातील झिºयातून दूषित पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागत आहे. चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी लगतच्या जंगलात जनावरे मोकाट सोडली आहेत. खैरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाण्यासाठी गावकºयांची पायपिट सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकºयांनी केली.

सध्या खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खैरखेडा भागात सिंचन प्रकल्प उभारणे, रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा

खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.संजय राठोड, ग्रामस्थ खैरखेडा

खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. दूरवरून दूषित पाणी आणून तहान भागविण्याची वेळ आम्हा गावकºयांवर आली आहे.- कनिराम राठोड, ग्रामस्थ, खैरखेडाचारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक पशुपालकांनी जंगलात जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी गावकºयांची अपेक्षा आहे.-दिलीप आडे, ग्रामस्थ खैरखेडा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई