शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

खैरखेड्यातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:02 IST

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे.

- यशवंत हिवराळेराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे पशुपालकांनी आपली जनावरे जंगलात मोकाट सोडली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.डोंगरावळ व खडकाळ भागात वसलेल्या खैरखेडा येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गावकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांची उपजिविका ही शेतीवरील कामावर आधारीत आहे. शेतीसिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे संपल्यानंतर रोजगारासाठी गावकºयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात गावातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून, दूरवरून नदीपात्रातील झिºयातून दूषित पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागत आहे. चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी लगतच्या जंगलात जनावरे मोकाट सोडली आहेत. खैरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाण्यासाठी गावकºयांची पायपिट सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकºयांनी केली.

सध्या खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खैरखेडा भागात सिंचन प्रकल्प उभारणे, रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा

खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.संजय राठोड, ग्रामस्थ खैरखेडा

खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. दूरवरून दूषित पाणी आणून तहान भागविण्याची वेळ आम्हा गावकºयांवर आली आहे.- कनिराम राठोड, ग्रामस्थ, खैरखेडाचारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक पशुपालकांनी जंगलात जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी गावकºयांची अपेक्षा आहे.-दिलीप आडे, ग्रामस्थ खैरखेडा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई