शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खैरखेड्यातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:02 IST

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे.

- यशवंत हिवराळेराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे पशुपालकांनी आपली जनावरे जंगलात मोकाट सोडली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.डोंगरावळ व खडकाळ भागात वसलेल्या खैरखेडा येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गावकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांची उपजिविका ही शेतीवरील कामावर आधारीत आहे. शेतीसिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे संपल्यानंतर रोजगारासाठी गावकºयांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्यात गावातील ५० टक्के कुटुंब रोजगाराच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून, दूरवरून नदीपात्रातील झिºयातून दूषित पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागत आहे. चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी लगतच्या जंगलात जनावरे मोकाट सोडली आहेत. खैरखेडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाण्यासाठी गावकºयांची पायपिट सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकºयांनी केली.

सध्या खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खैरखेडा भागात सिंचन प्रकल्प उभारणे, रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा

खैरखेडा येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा तसेच दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.संजय राठोड, ग्रामस्थ खैरखेडा

खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे. दूरवरून दूषित पाणी आणून तहान भागविण्याची वेळ आम्हा गावकºयांवर आली आहे.- कनिराम राठोड, ग्रामस्थ, खैरखेडाचारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक पशुपालकांनी जंगलात जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. खैरखेडा येथील दुष्काळी परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी गावकºयांची अपेक्षा आहे.-दिलीप आडे, ग्रामस्थ खैरखेडा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई