शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाल्ल्यांच्या भविष्यासाठी सरसावले पालक; लोकप्रतिनिधींच्या दारात दिली धडक

By सुनील काकडे | Updated: May 15, 2023 17:25 IST

वाशिमातील केंद्रीय विद्यालयासाठी इमारत मागणीचा लढा तीव्र

वाशिम : देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयाची वाशिममध्ये मात्र पार दयनिय अवस्था झाली आहे. पाच वर्षांपासून येथे जुन्या तथा जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेल्या या विद्यालयास हक्काची इमारत अद्याप मिळालेली नाही. राज्य सरकारच्या गचाळ कारभारामुळे उद्भवलेला हा प्रश्न पालकांच्या जिव्हारी लागला असून याविरोधात लढा उभारण्यात आला आहे. त्यानुषंगाने १५ मे रोजी पालकांनी सामूहिकरित्या आमदार लखन मलिक आणि अमीत झनक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली.

वाशिम शहरात २०१८ मध्ये केंद्रीय विद्यालय सुरू झाले. यामुळे विशेषत: माजी सैनिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोबतच ‘आरटीई’मधून सर्वसामान्यांच्या मुलांनाही विद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा असल्याने त्यांच्यातूनही आनंद व्यक्त झाला. दरम्यान, विद्यालयाची सुसज्ज इमारत उभी होत नाही, तोपर्यंत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या जागेत असलेल्या जुन्या टिनपत्र्याच्या इमारतीत विद्यालय चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीच दिवसांत इमारतीसाठी निधी मिळून प्रश्न मार्गी लागेन, अशी शक्यता होती; मात्र पाच वर्षे उलटूनही इमारतीसाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

जिल्हा प्रशासनाने केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीसाठी ‘एफ क्लास’ची जागा राखून ठेवली; मात्र या जागेचा आधी मोबदला अदा करा, अशी आडकाठी राज्य शासनाने घातली आहे. ही बाब केंद्रीय विद्यालय संघटनला मान्य नाही. तसेच जागेचा तिढा सुटत नसेल तर विद्यालयाची मान्यता रद्द करावी लागेन, असा इशारा भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने दिला आहे. विद्यालय बंद झाल्यास मुलांना कुठे शिकवायचे? त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय होणार? यासह इतर स्वरूपातील प्रश्न पालकांनी लोकप्रतिनिधींसमोर उपस्थित केले. आमदार या नात्याने अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणीही पालकांकडून करण्यात आली.जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा खालावला

गेल्या ४ वर्षांपासून ‘आकांक्षित’चे ओझे खांद्यावर पेलत असलेला वाशिम जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत आजही माघारलेलाच आहे. आकांक्षित जिल्ह्यांचा विकास साधण्यासंबंधीच्या पाच पॅरामिटर्समध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची बाब नमूद असताना प्रशासकीय यंत्रणा आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात कुठलेही ठोस प्रयत्न केले नाहीत.

५००  विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

शासनाचीच शाळा असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीकरिता जिल्हा प्रशासनाने ‘एफ क्लास’ची जागा राखून ठेवली. इमारत उभारण्याकरिता केंद्रीय विद्यालय संघटनेने कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे; मात्र राज्य शासन विनामूल्य जागा देण्याबाबत उदासिन आहे. या समस्येमुळे विद्यालय बंद झाल्यास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीwashimवाशिम