शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दिंडीच्या माध्यमातून जलजागृती करणारे केकतउमरा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 14:25 IST

राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ‘जलसाक्षरता दिंडी’चे आयोजन १३ आॅगष्ट २०१९ रोजी दत्तक ग्राम केकतउमरा येथे करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ‘जलसाक्षरता दिंडी’चे आयोजन १३ आॅगष्ट २०१९ रोजी दत्तक ग्राम केकतउमरा येथे करण्यात आले होते.आधुनिक काळात अनेक देशात जलसंकट निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात भारतातही मोठया प्रमाणात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जलजाणीव जागृतीच्या अभावी भारतात मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. हा अपव्यय थांबविण्यासाठी घरोघरी जाऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे महत्च सांगण्याचा प्रयत्न या रॅलीमधून करण्यात आला. पाण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जलसाक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यर्थ्यांनी ‘जमीन पाण्याने भरा शिवार समृद्ध करा’, ‘पाणी असेल तर सृष्टी दिसेल’, ‘जल असेल तर जीवन असेल’ अशा उद्बोधक घोषणा दिल्या. प्रदीप पट्टेबहादूर, किरण पट्टेबहाद्दूर, पुनम पट्टेबहादूर, वर्षा पायघन, अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचे महत्व पथनाटयाच्या माध्यमातून विषद केले. परमेश्वर गाभणे, आशिफ भवानिवले, सागर डुबे आदी स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थींनी या दिंडीत सहभागी झाले होते. नेहरू युवा केंद्र वाशिमनेही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी