शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

कारंजा निवडणूक निकाल : राजेंद्र पाटणींनी गड कायम राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:32 IST

Karanja Vidhan Sabha Election Results 2019: आमदार राजेंद्र पाटणी यांना ७३२०५ मते मिळालीत.

- दादाराव गायकवाड कारंजा: अगदी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून सातत्याने संभ्रम वाढविणाºया कारंजा-मानोरा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांचा तब्बल २२ हजार  ७२४ मतांनी पराभव करून या मतदार संघात सलग दुसºयांदा विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे जनतेने विकासाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.  विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर कारंजा मतदारसंघात मत विभाजनाचा फटका प्रमुख दावेदारांना बसणार, स्थानिक उमेदवाराला मतदार प्राधान्य देणार,  परिवर्तन होणार अशा प्रकारच्या चर्चांना सर्वत्र ऊत आला होता. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीला लढत नेमकी कोणात होणार हे चित्र स्पष्ट नव्हते. तथापि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कारंजा मतदारसंघातील लढत ही भाजपाचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके आणि बहुजन समाज पार्टीचे मो. युसूफ पुंजांनी या तिघातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या निवडणुकीत कारंजा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. भाजपने महायुतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ आपल्याकडेच राखत राजेंद्र पाटणी यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर दुसरीकडे कारंजा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूक असलेले प्रकाश डहाके यांना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यावर गेल्याने मोठा धक्का बसला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी त्यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर गतवेळी भारीप बमसंकडून लढलेले  मो. युसुफ पुंजांनी यांनी वंचित बहुजन आघाडीने तिकिट नाकारल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे तिकिट मिळवित निवडणूक लढविली. दरम्यान, हा मतदारसंघ भाजपाला गेल्याने प्रकाश डहाके यांच्या प्रमाणेच शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले डॉ. सुभाष राठोड यांनी मनसेची वाट धरली, तर वंचित बहुजन आघाडीने राजकारणात नवखेच असलेले डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी दिली. यात राजेंद्र पाटणी यांनी गत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आधार घेऊन मतदारांना पुन्हा विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले, दरम्यान, या मतदारसंघासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश डहाके यांच्या पाठीशी असल्याची चर्चा मतदारसंघात पसरली; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाल्याचे दिसले नाही. या निवडणुकीत प्रकाश डहाके यांना ५० हजार ८४१ मते मिळाली, तर तिसºया क्रमांकावर राहिलेले बसपाचे मो. युसूफ पुंजानी यांना ४१ हजार ९०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राम चव्हाण आणि मनसेचे डॉ. सुभाष राठोड यांना मात्र विशेष छाप पाडता आली नाही.

टॅग्स :karanja-acकरंजाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rajendra Patniराजेंद्र पाटणी