शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:00 IST

शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर आगाराची नांदखेडा, शेदुरजना मोरे मार्गे मंगरूळपीर-पिंजर ही बस शाळेच्या वेळेत पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विद्यार्थिनींनी शेलुबाजार येथे बसमध्ये चढून एकाही प्रवाशाला बसमधून खाली उतरू दिले नाही. सदर बस सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर विद्यार्थिनींना परत शेलुबाजार येथे सोडून देण्यात आले.अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी परिसरातील शेंदूरजना मोरे,नांदखेडा या गावातील विद्यार्थीविद्यार्थींनी या बसने शेलूबाजार येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. या गावातील विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय इतर पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. परंतु महामंडळाची बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला. त्यामुळे स्थानिक शेलुबाजार चौकात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मदतीने बस मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आली. तिथे संबंधित आगार प्रमुखांना बोलावून विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखासमोर समस्या मांडल्या. यापुढे दररोज वेळेच्या आत बस पोहचविण्याची मागणी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद लांभाडे यांच्यासह पालक उपस्थित होते.शाळा सुटेपर्यंत बस शाळेसमोरच उभीशेलूबाजार येथील सर्व विद्यार्थ्यांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनला घेवून गेलेली बस विद्यार्थिनींना सोडण्यासाठी शेलूबाजार येथे परत आली आणि शाळा सुटत नाही, तोवर शाळेच्या समोरच उभी होती. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थांना घेवून अंदाजे ५ वाजता पिंजरकडे रवाना झाली.मानव विकास मिशन अंतर्गतविद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विशेष गाड्या प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या.परंतु महामंडळाने मानव विकासच्या उद्देशाला हरताळ फासत या गाड्या प्रवाशी वाहतूकीसाठी इतरत्र वापरत विद्यार्थ्यांना वाºयावर सोडले. याआधीही गाडी उशीरा येत असल्याने तिनवेळा थेट मंगरूळपीर आगार गाठून तक्रार केली होती. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळेच्या वेळेत बस पोहचत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारू. - निकीता डगवाल, विद्यार्थीनी, शेंदूरजना मोरे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरStudentविद्यार्थी