शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:00 IST

शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर आगाराची नांदखेडा, शेदुरजना मोरे मार्गे मंगरूळपीर-पिंजर ही बस शाळेच्या वेळेत पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विद्यार्थिनींनी शेलुबाजार येथे बसमध्ये चढून एकाही प्रवाशाला बसमधून खाली उतरू दिले नाही. सदर बस सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर विद्यार्थिनींना परत शेलुबाजार येथे सोडून देण्यात आले.अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी परिसरातील शेंदूरजना मोरे,नांदखेडा या गावातील विद्यार्थीविद्यार्थींनी या बसने शेलूबाजार येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. या गावातील विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय इतर पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. परंतु महामंडळाची बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला. त्यामुळे स्थानिक शेलुबाजार चौकात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मदतीने बस मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आली. तिथे संबंधित आगार प्रमुखांना बोलावून विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखासमोर समस्या मांडल्या. यापुढे दररोज वेळेच्या आत बस पोहचविण्याची मागणी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद लांभाडे यांच्यासह पालक उपस्थित होते.शाळा सुटेपर्यंत बस शाळेसमोरच उभीशेलूबाजार येथील सर्व विद्यार्थ्यांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनला घेवून गेलेली बस विद्यार्थिनींना सोडण्यासाठी शेलूबाजार येथे परत आली आणि शाळा सुटत नाही, तोवर शाळेच्या समोरच उभी होती. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थांना घेवून अंदाजे ५ वाजता पिंजरकडे रवाना झाली.मानव विकास मिशन अंतर्गतविद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विशेष गाड्या प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या.परंतु महामंडळाने मानव विकासच्या उद्देशाला हरताळ फासत या गाड्या प्रवाशी वाहतूकीसाठी इतरत्र वापरत विद्यार्थ्यांना वाºयावर सोडले. याआधीही गाडी उशीरा येत असल्याने तिनवेळा थेट मंगरूळपीर आगार गाठून तक्रार केली होती. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळेच्या वेळेत बस पोहचत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारू. - निकीता डगवाल, विद्यार्थीनी, शेंदूरजना मोरे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरStudentविद्यार्थी