शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:02 IST

प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जवळपास २० वर्षांपूर्वी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जि.प. लघूसिंचन विभागाकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाला; परंतु दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. आता या प्रकल्पातील गाळाचा तातडीने उपसा करून खोली वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्यावतीने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा निधीही उपलब्ध केला; परंतु अस्तित्वात असलेल्या साधनांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नव्या योजनांचा शेतकºयांना फायदा होत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रकल्पातील गाळाचा उपसा झालेला नाही. आधीच अवर्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रकल्पांत पुरेसा जलसंचय होत नाही. त्यात गाळ साचल्याने खोली कमीही झाली आहे. अशातही या प्रकल्पांतून गाळाचा वारेमाप उपसा होत नाही. पाणी उपशावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. नियोजनाची अमलबजावणीही कागदोपत्रीच राहते. त्यामुळे प्रकल्प हिवाळ्यांतच तळ गाठतात. अशीच स्थिती मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील प्रकल्पाची झाली आहे. २० वर्षांच्यापूर्वी उभारलेल्या या प्रकल्पावर शेकडो हेक्टर सिंचन केले जाते. तथापि, या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रासह साठवण क्षेत्रात मोठा गाळ साचला असून, झुडपांचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची साठवण क्षमता खूप कमी झाली असून, शेतकºयांना आता या प्रकल्पाचा पूर्वीसारखा फायदा होत नाही. हा प्रकल्पाने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तळ गाठला आणि आता हा प्रकल्प पूर्ण कोरडा पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानातून या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून त्याची खोली वाढवावी, अशी मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प