शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:02 IST

प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जवळपास २० वर्षांपूर्वी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जि.प. लघूसिंचन विभागाकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाला; परंतु दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. आता या प्रकल्पातील गाळाचा तातडीने उपसा करून खोली वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्यावतीने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा निधीही उपलब्ध केला; परंतु अस्तित्वात असलेल्या साधनांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नव्या योजनांचा शेतकºयांना फायदा होत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रकल्पातील गाळाचा उपसा झालेला नाही. आधीच अवर्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रकल्पांत पुरेसा जलसंचय होत नाही. त्यात गाळ साचल्याने खोली कमीही झाली आहे. अशातही या प्रकल्पांतून गाळाचा वारेमाप उपसा होत नाही. पाणी उपशावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. नियोजनाची अमलबजावणीही कागदोपत्रीच राहते. त्यामुळे प्रकल्प हिवाळ्यांतच तळ गाठतात. अशीच स्थिती मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील प्रकल्पाची झाली आहे. २० वर्षांच्यापूर्वी उभारलेल्या या प्रकल्पावर शेकडो हेक्टर सिंचन केले जाते. तथापि, या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रासह साठवण क्षेत्रात मोठा गाळ साचला असून, झुडपांचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची साठवण क्षमता खूप कमी झाली असून, शेतकºयांना आता या प्रकल्पाचा पूर्वीसारखा फायदा होत नाही. हा प्रकल्पाने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तळ गाठला आणि आता हा प्रकल्प पूर्ण कोरडा पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानातून या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून त्याची खोली वाढवावी, अशी मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प