शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:02 IST

प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जवळपास २० वर्षांपूर्वी सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जि.प. लघूसिंचन विभागाकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाला; परंतु दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असतानाच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. आता या प्रकल्पातील गाळाचा तातडीने उपसा करून खोली वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्यावतीने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा निधीही उपलब्ध केला; परंतु अस्तित्वात असलेल्या साधनांकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नव्या योजनांचा शेतकºयांना फायदा होत नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रकल्पातील गाळाचा उपसा झालेला नाही. आधीच अवर्षणाचे प्रमाण वाढल्याने प्रकल्पांत पुरेसा जलसंचय होत नाही. त्यात गाळ साचल्याने खोली कमीही झाली आहे. अशातही या प्रकल्पांतून गाळाचा वारेमाप उपसा होत नाही. पाणी उपशावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. नियोजनाची अमलबजावणीही कागदोपत्रीच राहते. त्यामुळे प्रकल्प हिवाळ्यांतच तळ गाठतात. अशीच स्थिती मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील प्रकल्पाची झाली आहे. २० वर्षांच्यापूर्वी उभारलेल्या या प्रकल्पावर शेकडो हेक्टर सिंचन केले जाते. तथापि, या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रासह साठवण क्षेत्रात मोठा गाळ साचला असून, झुडपांचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची साठवण क्षमता खूप कमी झाली असून, शेतकºयांना आता या प्रकल्पाचा पूर्वीसारखा फायदा होत नाही. हा प्रकल्पाने यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तळ गाठला आणि आता हा प्रकल्प पूर्ण कोरडा पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानातून या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून त्याची खोली वाढवावी, अशी मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प