शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तुटलेला वीज खांब देतोय अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:33 IST

आसेगाव: वाशिम-कारंजा दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धानोरा ते मसोला फाट्याजवळ मुख्य वाहिनीचा वीज खांब मधोमध तुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव: वाशिम-कारंजा दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धानोरा ते मसोला फाट्याजवळ मुख्य वाहिनीचा वीज खांब मधोमध तुटला आहे. वादळी वाºयामुळे हा खांब रस्त्याने जाणाºया वाहनावर कोसळून अथवा रस्त्यावर कोसळून अपघात घडण्याची भिती आहे. तथापि, या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-मंगरुळपीर दरम्यान महामार्गाचे काम सुरू करण्यात आल्यानंतर या मार्गावर अडथळा येणारे वीजखांब महावितरकडून हटवून बाजूला करण्यात आले आहेत. काही खांब हलविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. याच मार्गावर महावितरणच्यावतीने बसविण्यात आलेला एक खांब मधोमध तुटला आहे. धानोरा ते मसोला फाट्यादरम्यान अगदी रस्त्यालगत हा खांब असल्याने एखादवेळी हा वीजखांब कोसळल्यास अपघात घडण्याची भिती आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मंगरुळपीर, अमरावती, यवतमाळ, दिग्रस, पुसद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, पुणे आदि ठिकाणी येजा करणाºया परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहने, माल वाहतूक करणारे ट्रक अशा असंख्य वाहनांची यावर वर्दळ असते. अशात एखाद्या वाहनावर हा खांब कोसळल्यास जिवित हानी होण्याचीही भिती आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाºयामुळे हा खांब कधीही कोसळू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन हा खांब तातडीने बदलावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनधारकही करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण