शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अफरातफर प्रकरणांची चौकशी थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:18 IST

धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये विविध स्वरूपातील घोटाळे झाले. सन २०१० पासून आजतागायत अफरातफर व प्रशासकीय अनियमिततेची अशी १५० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेकडे दाखल आहेत. ही प्रकरणे निकाली निघून धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात; मात्र बहुतांश प्रकरणांचा तपास थंडबस्त्यात असल्याने दोषींना अभय मिळत आहे.शासनस्तरावरून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी खर्च करित असताना जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिवांनी संगणमतातून आर्थिक गैरव्यवहार केला. याप्रकरणी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पंचायत समित्यांकडे तक्रारी केल्या. तेथून जिल्हा परिषदेकडे तक्रारींच्या फाईल्स सादर करण्यात आल्या. असे असताना प्रत्यक्ष चौकशीस विलंब लागण्यासह पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सरपंच पदावरून पायऊतार होणे, ग्रामसेवकांच्या इतरत्र बदल्या होणे, चौकशी पथकास तपासकार्यात अपेक्षित सहकार्य न मिळणे आदी कारणांमुळे बहुतांश प्रकरणांमधील दोषींवर कारवाई तर झाली नाहीच; शिवाय शासकीय निधीत अफरातफर आणि प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये वर्षागणिक वाढ होत गेली.प्राप्त माहितीनुासर, सन २०१० ते २०१९ या ९ वर्षाच्या कालावधीत शासकीय निधीत अफरातफरची ३०० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात दाखल झाली. त्यातील १५० च्या आसपास प्रकरणे निकाली काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र उर्वरित प्रकरणांवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने गैरव्यवहार करणारे तत्कालिन व काही विद्यमान सरपंच, सचिवांना एकप्रकारे अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, विकासकामांकरिता दिल्या जाणाºया शासकीय निधीत अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंचाकडून रकमेची वसूली करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत संबंधिताने गैरव्यवहाराची रक्कम अदा न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १७९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून कारागृहात टाकणे किंवा मालमत्तेवर टाच लावून वसूली करण्याचे प्रावधान आहे.

पंचायत विभागाकडे दाखल अफरातफर प्रकरणांच्या चौकशीत शक्यतोवर विलंब केला जात नाही. काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याकडेही विशेषत्वाने लक्ष दिले जाईल. शासकीय निधीत अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद