शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अफरातफर प्रकरणांची चौकशी थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:18 IST

धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये विविध स्वरूपातील घोटाळे झाले. सन २०१० पासून आजतागायत अफरातफर व प्रशासकीय अनियमिततेची अशी १५० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेकडे दाखल आहेत. ही प्रकरणे निकाली निघून धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात; मात्र बहुतांश प्रकरणांचा तपास थंडबस्त्यात असल्याने दोषींना अभय मिळत आहे.शासनस्तरावरून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी खर्च करित असताना जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिवांनी संगणमतातून आर्थिक गैरव्यवहार केला. याप्रकरणी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पंचायत समित्यांकडे तक्रारी केल्या. तेथून जिल्हा परिषदेकडे तक्रारींच्या फाईल्स सादर करण्यात आल्या. असे असताना प्रत्यक्ष चौकशीस विलंब लागण्यासह पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सरपंच पदावरून पायऊतार होणे, ग्रामसेवकांच्या इतरत्र बदल्या होणे, चौकशी पथकास तपासकार्यात अपेक्षित सहकार्य न मिळणे आदी कारणांमुळे बहुतांश प्रकरणांमधील दोषींवर कारवाई तर झाली नाहीच; शिवाय शासकीय निधीत अफरातफर आणि प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये वर्षागणिक वाढ होत गेली.प्राप्त माहितीनुासर, सन २०१० ते २०१९ या ९ वर्षाच्या कालावधीत शासकीय निधीत अफरातफरची ३०० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात दाखल झाली. त्यातील १५० च्या आसपास प्रकरणे निकाली काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र उर्वरित प्रकरणांवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने गैरव्यवहार करणारे तत्कालिन व काही विद्यमान सरपंच, सचिवांना एकप्रकारे अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, विकासकामांकरिता दिल्या जाणाºया शासकीय निधीत अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंचाकडून रकमेची वसूली करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत संबंधिताने गैरव्यवहाराची रक्कम अदा न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १७९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून कारागृहात टाकणे किंवा मालमत्तेवर टाच लावून वसूली करण्याचे प्रावधान आहे.

पंचायत विभागाकडे दाखल अफरातफर प्रकरणांच्या चौकशीत शक्यतोवर विलंब केला जात नाही. काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याकडेही विशेषत्वाने लक्ष दिले जाईल. शासकीय निधीत अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद