शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:17 IST

कृषी विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या तपासणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

वाशिम: पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांकडून विमारकमेशिवाय कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सुचना देण्यासह दर्शनी भागांत माहिती फलक लावण्याच्या सुचना कृषी विभागाने आपले सरकार सेवा केंद्रांना प्रत्यक्ष पाहणी करून दिल्या होत्या. त्यानंतरही आपले सरकार सेवा केंद्रांवर पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांकडून कागदपत्रांचे पैसे तसेच ईतर अतिरिक्त शुल्क आकारुन अवैध वसुली केली जात होती. लोकमतने १९ जुलै रोजी या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या तपासणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या योजनेंतर्गत शेतकºयांकडून १ जुलैपासूनच पीकविमा भरून घेतला जात आहे. शेतकºयांना नजिक चे आपले सरकार सेवा केंद्र, किंवा सेतू केंद्र संबंधित बँक, सेवासोसायटीत पीकविमा काढता येतो. या योजनेची मुदत संपत असताना शेतकरी पीकविमा काढण्याची घाई करीत आहेत. तथापि, पीकविमा काढण्यासाठी पीकविमा रकमेशिवाय कोणतेही शुल्क देण्याची गरज नसतानाही शेतकºयांकडून काही केंद्रांत अवैध वसुली केली जात असल्याचे, तसेच शेतकºयांना माहितीसाठी दर्शनी भागांत फलक लावले नसल्याचा प्रकार पाहायला मिळत होता. शिवाय डिजिटल सातबारासाठी ५० रुपये, तर परिश्रम म्हणून १५ ते २० रुपयांसह १०० रुयांपर्यत शेतकºयांकडून वसुली केली जात होती. लोकमतने या संदर्भात १९ जुलै रोजीच्या अंकात ‘पीकविमा काढणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून अवैध वसुली!’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल कृषी विभागाने घेत आपले सरकार सेवा केंद्राची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाºयांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

फलक न लावल्यास कारवाईप्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकºयांना आवश्यक आणि अचूक माहिती देण्यासह विमा रकमेशिवाय कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचा उल्लेख असलेले फलक प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर दर्शनी भागात लावण्याची सक्ती कृषी विभागाच्या पथकाने केली आहे. सहाही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांस उपविभागीय कृषी अधिकाºयांकडून याची पडताळणीही केली जाणार आहे. त्यात दिरंगाई करणाºया आपले सरकार सेवा केंद्र चालकावर नियमानुसार कारवाईसुद्धा केली जाणार असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.पीकविमा भरण्याची मुदत आता जवळ येत आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.- शंकरराव तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी