शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कपाशीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 17:16 IST

या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागात शेतकरी नैसर्गिक आपत्तीनी बेजार झालेला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडिद, या पिकांना मोठा फटका बसला असताना आता कपाशीवर रस शोषक अळीसह शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कृषी विभागाच्या पीक पाहणीत आढळले आहे. या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.यंदाच्या हंगामातील कपाशीचे पीक पात्या, बोंडावर आले आहे. या पिकावरील किडींचा प्रादूर्भाव नियंत्रीत करण्यासाठी शेतकरी बांधव विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. दरम्यान, पिकांवरील किडरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (क्रॉपसॅप) कृषी विभागाकडून कपाशीच्या पिकाची पाहणी करण्यात येत आहे. त्यात गत आठवड्यापर्यंत केलेल्या पाहणीत राज्यातील २० जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला होता. आता कपाशीच्या पिकावर शेंद्री बोंडअळीसह रसशोषक अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, बहुतांश भागांत या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर नोंदविला आहे. त्यामुळे यंदाही बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत कपाशीचे पीक पात्या आणि बोंडधारणेच्या अवस्थेत आहे. पिकाची स्थिती उत्तम असली तरी, जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी कपाशीवर बोंडअळी आणि रसशोषक अळीचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. एखाद, दोन ठिकाणी या किडींचे प्रमाण नुकसान पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून, शेतकºयांना या संदर्भात मार्गदर्शन करून फेरोमन सापळ्यांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी