शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कपाशीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 17:16 IST

या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागात शेतकरी नैसर्गिक आपत्तीनी बेजार झालेला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडिद, या पिकांना मोठा फटका बसला असताना आता कपाशीवर रस शोषक अळीसह शेंद्री बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कृषी विभागाच्या पीक पाहणीत आढळले आहे. या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे.यंदाच्या हंगामातील कपाशीचे पीक पात्या, बोंडावर आले आहे. या पिकावरील किडींचा प्रादूर्भाव नियंत्रीत करण्यासाठी शेतकरी बांधव विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. दरम्यान, पिकांवरील किडरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (क्रॉपसॅप) कृषी विभागाकडून कपाशीच्या पिकाची पाहणी करण्यात येत आहे. त्यात गत आठवड्यापर्यंत केलेल्या पाहणीत राज्यातील २० जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला होता. आता कपाशीच्या पिकावर शेंद्री बोंडअळीसह रसशोषक अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, बहुतांश भागांत या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर नोंदविला आहे. त्यामुळे यंदाही बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत कपाशीचे पीक पात्या आणि बोंडधारणेच्या अवस्थेत आहे. पिकाची स्थिती उत्तम असली तरी, जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी कपाशीवर बोंडअळी आणि रसशोषक अळीचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. एखाद, दोन ठिकाणी या किडींचे प्रमाण नुकसान पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून, शेतकºयांना या संदर्भात मार्गदर्शन करून फेरोमन सापळ्यांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी