शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:38 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे. सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीताना सद्यस्थितीत ९४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पेरणीचा समावेश आहे.मागील तीन वर्षांत यंदा प्रथमच जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला, तर विहिरी, कूपनलिकांची पातळीही वाढली. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाची सोय झाली. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने सुमारे ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन केले. त्यात हरभºयाचे सरासरी क्षेत्र ६२३९२ हेक्टर, तर गव्हाचे क्षेत्र २८ हजार हेक्टर होते. यामध्ये हरभरा पिकाची पेरणी ही नियोजित क्षेत्रापेक्षा ७ हजार हेक्टर क्षेत्राने वाढली. सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी सुरू असून, जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गळीत धान्याबाबत शेतकरी यंदाही उदासीन असून, यंदा ५१४ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी कृषी विभागाकडून नियोजित करण्यात आली होती. त्यात करडईचे क्षेत्र ३६८ हेक्टर अपेक्षीत असताना केवळ २९.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, सुर्यफुलाचे क्षेत्र २२ हेक्टर नियोजित असताना केवळ ५.२ हेक्टर, तर इतर गळीत पिकांचे नियोजित क्षेत्र १२४ हेक्टर असताना अवघ्या २.५ हेक्टर  इतर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष ३७.१ हेक्टर क्षेत्रावरच गळीताची पेरणी झाली. हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या तुलनेत १ टक्काही नाही.  रब्बी ज्वारीच्या पेऱ्यात घटजिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने १३९७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन केले होते; परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. यंदा गत आठवड्यापर्यंत केवळ ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. वन्यप्राण्यांची भिती आणि पिकासाठी लागणाºया खर्चाच्या तुलनेत बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी या पिकाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी