शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:54 IST

इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.

इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे पुरातन गावतलाव आहे. पूर्वी या तलावाचा गावकऱ्यांना आधार होता; परंतु गावात विहिरी, कूपनलिका खोदल्यानंतर तलावाकडे दुर्लक्ष झाले आणि हा तलाव बुजला.  या तलावात साचणाऱ्या पाण्यामुळे गावातील पाणीपातळी कायम राहत होती; परंतु तो बुजल्यामुळे गावातील जलस्त्रोत लवकरच आटू लागले आणि गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन इंझोरी येथील ग्रामचेतना मंडळाने या तलावाचे खोलीकरण श्रमदानातून करण्याची संकल्पना मांडली. त्याला गावकऱ्यांचा प्रतिसादही लाभला. उन्हाळ्याच्या दिवसांत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी या तलावासाठी श्रमदान केले. आता या तलावात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला असून, यामुळे गावातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा गावकºयांना होत असून, पाणीटंचाईची समस्या आता हद्दपार झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी