शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मारसूळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 17:53 IST

नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मारसूळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मारसुळ येथे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येत वाढ झाली आहे. जिल्हा परिषद शाळा मारसूळ येथे लोकवर्गणी व शासन निधीतून संगणक कक्ष, नाविण्यपूर्ण बालविज्ञान केंद्र, वाचनालय, बालसंशोधन जपवणुक केंद, सेंद्रीय भाजीपाला, शुध्दजल, हँडवॉश स्टेशन यासह अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. या शाळेने १२ निराधार मुलांना आधार दिला आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने अन्य ठिकाणच्या कॉन्व्हेंटमधील तब्बल २२ विद्यार्थी परत या शाळेत परतले आहेत. १३ जुन  २०१८ रोजी मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर मनोहर बाहे यांनी सरपंचपती रामेश्वर घुगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, गावकरी व शिक्षकांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले. सन २०१८ मध्ये १२९ असलेला विद्यार्थी पट हा २०१९ मध्ये १५२ वर पोहोचला. केंद्र  प्रमुख दिलीप गवई यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.  शाळा विकासासाठी सर्वप्रथम केंद्र  प्रमुखांसह सर्व शिक्षकांनी प्रत्येक ी ५ हजार रुपये प्रमाणे वर्गणी गोळा करुन वीजपुरवठा व मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तब्बल ३०० फुट अंतरावरुन पाणी आणुन मुलांना शुध्दजल देणे सुरु झाले. भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांत नाविण्यपूर्ण उपक्रमांचा वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व विद्यार्थीकेंद्रीत बनविली. याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.  सर्वांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास कसा साधला येईल, याला प्राधान्य दिले आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे या शाळेच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.-मनोहर बाहे, मुख्याध्यापक मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे साधला जात आहे, याचा पालक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.अर्चना घुगे, पालक नाविण्यपूर्ण बालविज्ञान केंद्रविद्यार्थ्यांना विज्ञानाची गोड लागावी याकरीता मारसूळ शाळेत बालविज्ञान केंद्र उभारण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांचे सहकार्य घेतले. शासन निधी व लोकवर्गणीतून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. सेंद्रीय भाजीपाला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी भाजीपाल्यांचे महत्व सांगितले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा