शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

शाळा, महाविद्यालयांच्या पटसंख्येत सुधारणा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:55 IST

कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करुन शाळा व महाविद्यालयांची सुधारीत पटसंख्या निर्धारित करण्यात यावी, या मागणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की संचमान्यतेमध्ये पुर्वी इयत्ता पाचवीकरिता २० विद्यार्थी संख्या तसेच सहावी ते आठवीकरिता ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण ठरविण्यात आले; परंतु सद्या विविध स्वरूपातील कारणांमुळे सर्वच ठिकाणच्या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे पटसंख्या धोरणात देखील बदल होणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तथापि, इयत्ता पाचवीमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे १ तसेच इयत्ता सहावी ते आठवीकरिता ३५ पटसंख्येऐवजी २५ ते ३० विद्यार्थीसंख्या ठेवावी. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी