शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

शंभर वर्षांपासूनच्या विहिरींचे संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे ...

वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे पाडून विहिरी तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे गावागावात विहिरींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली; मात्र यामुळे जलस्रोताची पातळीदेखील दिवसागणिक खोलवर गेली. दरम्यान, गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते आणि आता स्थिती काय, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत राज्यातील ८०० पेक्षा अधिक गावांमध्ये संशोधन केले जात आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पर्यावरण, अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली. याअंतर्गत प्रामुख्याने पाण्याचा शाश्वत वापर (जल व्यवस्थापन) आणि पर्यावरणाचे पुर्नसंचयन (पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे) या बाबींवर भर दिला जात आहे. राज्यातील ज्या ८०० पेक्षा अधिक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मृदा आणि जलसंधारणाचा टप्पा पार केला, त्या गावांचा समृद्ध गाव स्पर्धेत समावेश झालेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने जल व्यवस्थापन, पीक व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. गावाची भाैगोलिक स्थिती, दरवर्षी होणारे पर्जन्यमान आणि पाण्याचा विविध कारणांसाठी होणारा वापर याचा ताळेबंद गावकऱ्यांनी स्वत:च तयार करून जल व्यवस्थापन करण्यासंबंधी प्रभावी जनजागृती केली जात आहे.

त्यानुषंगाने गावात पहिली विहीर नेमकी कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते, त्या विहिरीत उपलब्ध पाण्याची सध्या स्थिती काय, गेल्या काही वर्षांत कूपनलिका खोदण्याचे प्रमाण किती, आदिंबाबतचा ‘डाटा’ गावकऱ्यांकडूनच गोळा करून घेतला जात आहे. यासह गावात सध्या उपलब्ध विहिरी आणि कूपनलिकांमधील उपलब्ध पाण्याचे वर्षातून चारवेळा मोजमाप करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंबंधीचे धडेही गिरविले जात आहेत. यामाध्यमातून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी ८०० पेक्षा अधिक गावांमधील गावकरी पाण्याच्या बाबतीत जागरूक होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

.....................

बाॅक्स :

भूजल टाकी रिक्त होऊ नये!

गेल्या अनेक वर्षांत कुठल्याही गावातील शिवार क्षेत्रात विशेष वाढ झालेली नाही. भूगर्भात स्वत:हून पाणी निर्माण होत नाही; तर दरवर्षीच्या पर्जन्यमानावर ही बाब पूर्णत: विसंबून आहे. अशा स्थितीत जमिनीला ठिकठिकाणी शेकडो फुटांचे खड्डे पाडून विहीर अथवा कूपनलिकांची संख्या वाढविण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. यामुळे कधीकाळी कधीच न आटणारी विहीर अथवा कूपनलिका आजमितीस कोरड्या राहत असल्याचे दिसत आहे. तथापि, किमान आतातरी भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा थांबणे आवश्यक आहे; अन्यथा गाव शिवारातील भूजल टाकी रिक्त होण्याची भीती असून ही बाब समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून गावोगावच्या लोकांना पटवून देण्यात येत आहे.

......................

कोट :

गावातील उपलब्ध जलस्त्रोत अधिक बळकट व्हावे, दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यमानाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार गावकऱ्यांनी जल व पीक व्यवस्थापन करावे, यासंबंधी समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, तेव्हापासून आजतागायत खोदलेल्या विहिरी व कूपनलिकांची संख्या किती, याचाही ताळेबंद गावकऱ्यांच्या माध्यमातून तयार करून घेतला जात आहे.

- सुभाष नानवटे

समन्वयक, पश्चिम वऱ्हाड, समृद्ध गाव स्पर्धा