शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

शंभर वर्षांपासूनच्या विहिरींचे संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे ...

वाशिम : पूर्वी अगदीच १० ते १५ फूट जमीन खोदली तरी पक्क्या पाण्याचे झरे मिळायचे. कालांतराने जमिनीला ठिकठिकाणी खड्डे पाडून विहिरी तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे गावागावात विहिरींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली; मात्र यामुळे जलस्रोताची पातळीदेखील दिवसागणिक खोलवर गेली. दरम्यान, गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते आणि आता स्थिती काय, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत राज्यातील ८०० पेक्षा अधिक गावांमध्ये संशोधन केले जात आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पर्यावरण, अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात आली. याअंतर्गत प्रामुख्याने पाण्याचा शाश्वत वापर (जल व्यवस्थापन) आणि पर्यावरणाचे पुर्नसंचयन (पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे) या बाबींवर भर दिला जात आहे. राज्यातील ज्या ८०० पेक्षा अधिक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मृदा आणि जलसंधारणाचा टप्पा पार केला, त्या गावांचा समृद्ध गाव स्पर्धेत समावेश झालेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने जल व्यवस्थापन, पीक व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. गावाची भाैगोलिक स्थिती, दरवर्षी होणारे पर्जन्यमान आणि पाण्याचा विविध कारणांसाठी होणारा वापर याचा ताळेबंद गावकऱ्यांनी स्वत:च तयार करून जल व्यवस्थापन करण्यासंबंधी प्रभावी जनजागृती केली जात आहे.

त्यानुषंगाने गावात पहिली विहीर नेमकी कधी खोदल्या गेली, त्यास किती फुटावर पाणी लागले होते, त्या विहिरीत उपलब्ध पाण्याची सध्या स्थिती काय, गेल्या काही वर्षांत कूपनलिका खोदण्याचे प्रमाण किती, आदिंबाबतचा ‘डाटा’ गावकऱ्यांकडूनच गोळा करून घेतला जात आहे. यासह गावात सध्या उपलब्ध विहिरी आणि कूपनलिकांमधील उपलब्ध पाण्याचे वर्षातून चारवेळा मोजमाप करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंबंधीचे धडेही गिरविले जात आहेत. यामाध्यमातून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी ८०० पेक्षा अधिक गावांमधील गावकरी पाण्याच्या बाबतीत जागरूक होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

.....................

बाॅक्स :

भूजल टाकी रिक्त होऊ नये!

गेल्या अनेक वर्षांत कुठल्याही गावातील शिवार क्षेत्रात विशेष वाढ झालेली नाही. भूगर्भात स्वत:हून पाणी निर्माण होत नाही; तर दरवर्षीच्या पर्जन्यमानावर ही बाब पूर्णत: विसंबून आहे. अशा स्थितीत जमिनीला ठिकठिकाणी शेकडो फुटांचे खड्डे पाडून विहीर अथवा कूपनलिकांची संख्या वाढविण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. यामुळे कधीकाळी कधीच न आटणारी विहीर अथवा कूपनलिका आजमितीस कोरड्या राहत असल्याचे दिसत आहे. तथापि, किमान आतातरी भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा थांबणे आवश्यक आहे; अन्यथा गाव शिवारातील भूजल टाकी रिक्त होण्याची भीती असून ही बाब समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून गावोगावच्या लोकांना पटवून देण्यात येत आहे.

......................

कोट :

गावातील उपलब्ध जलस्त्रोत अधिक बळकट व्हावे, दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यमानाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार गावकऱ्यांनी जल व पीक व्यवस्थापन करावे, यासंबंधी समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गावात पहिली विहीर कधी खोदल्या गेली, तेव्हापासून आजतागायत खोदलेल्या विहिरी व कूपनलिकांची संख्या किती, याचाही ताळेबंद गावकऱ्यांच्या माध्यमातून तयार करून घेतला जात आहे.

- सुभाष नानवटे

समन्वयक, पश्चिम वऱ्हाड, समृद्ध गाव स्पर्धा