शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते निर्मितीसाठी शेकडो वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:44 IST

५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून उभी असलेली कडूलिंब, बाभूळ, बिहाडा, काटसावर, चिमन-साग, सालई अशी सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे.सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत. वृक्षप्रेमींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून जात असलेल्या चार राष्टÑीय महामार्गांची तद्वतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गंत रस्त्यांची कामे सुरू असून त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.वाशिम जिल्ह्यात वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा, कारंजा ते मानोरा अशा चार राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांमधून इतरही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यादरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली दुतर्फा ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून उभी असलेली कडूलिंब, बाभूळ, बिहाडा, काटसावर, चिमन-साग, सालई अशी सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत. परिणामी, रस्ते विकास तर होत आहे; परंतु सोबतच पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक वनिकरण विभागाने गत काही वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आणि योग्य संगोपनामुळे बऱ्यापैकी वाढलेली झाडेही यातून सुटलेली नाहीत. यामुळे कधीकाळी हिरव्याकंच झाडांनी व्यापलेली रस्ते आता मात्र पूर्णत: बोडखी दिसत असून वृक्षप्रेमींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. वनविभागामार्फत काढले जाते वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडल्या जाणाºया वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’ काढण्याचे काम वनविभागामार्फत होत असून संबंधित कंत्राटदाराने सदर रक्कम शासनखात्यात जमा केल्यानंतर तोडल्या जाणारे झाड त्याच्या मालकीचे होते. या पद्धतीने आतापर्यंत शेकडो वृक्षांची तोड झाली असून त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकारामुळे गंभीर स्थिती उद्भवण्याचे संकेत आहेत. यामुळे विकास नव्हे; तर भकासपणा वाढत चालला असून प्राणवायूअभावी फुफ्फुसाच्या आजारांचे प्रस्थ वाढणार आहे. माणसाचे अस्त्विच जर यामुळे धोक्यात येत असेल तर कशाला हवा अशा प्रकारचा विकास.- माधवराव मारशेटवार, वृक्षमित्र, वाशिमशासनस्तरावरून एकीकडे वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र नैसर्गिकरित्या वाढलेल्या वृक्षांची रस्ते विकासाच्या गोंडस नावाखाली कत्तल केली जात आहे. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.- नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग