शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

रस्ते निर्मितीसाठी शेकडो वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:44 IST

५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून उभी असलेली कडूलिंब, बाभूळ, बिहाडा, काटसावर, चिमन-साग, सालई अशी सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे.सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत. वृक्षप्रेमींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून जात असलेल्या चार राष्टÑीय महामार्गांची तद्वतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गंत रस्त्यांची कामे सुरू असून त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.वाशिम जिल्ह्यात वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा, कारंजा ते मानोरा अशा चार राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांमधून इतरही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यादरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली दुतर्फा ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून उभी असलेली कडूलिंब, बाभूळ, बिहाडा, काटसावर, चिमन-साग, सालई अशी सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत. परिणामी, रस्ते विकास तर होत आहे; परंतु सोबतच पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक वनिकरण विभागाने गत काही वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आणि योग्य संगोपनामुळे बऱ्यापैकी वाढलेली झाडेही यातून सुटलेली नाहीत. यामुळे कधीकाळी हिरव्याकंच झाडांनी व्यापलेली रस्ते आता मात्र पूर्णत: बोडखी दिसत असून वृक्षप्रेमींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. वनविभागामार्फत काढले जाते वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडल्या जाणाºया वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’ काढण्याचे काम वनविभागामार्फत होत असून संबंधित कंत्राटदाराने सदर रक्कम शासनखात्यात जमा केल्यानंतर तोडल्या जाणारे झाड त्याच्या मालकीचे होते. या पद्धतीने आतापर्यंत शेकडो वृक्षांची तोड झाली असून त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकारामुळे गंभीर स्थिती उद्भवण्याचे संकेत आहेत. यामुळे विकास नव्हे; तर भकासपणा वाढत चालला असून प्राणवायूअभावी फुफ्फुसाच्या आजारांचे प्रस्थ वाढणार आहे. माणसाचे अस्त्विच जर यामुळे धोक्यात येत असेल तर कशाला हवा अशा प्रकारचा विकास.- माधवराव मारशेटवार, वृक्षमित्र, वाशिमशासनस्तरावरून एकीकडे वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र नैसर्गिकरित्या वाढलेल्या वृक्षांची रस्ते विकासाच्या गोंडस नावाखाली कत्तल केली जात आहे. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.- नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग