शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:33 IST

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २५ व २६ सप्टेंबर रोजीच्या परतीच्या पावसामुळे मारसूळ, इंझोरी, मोहरी यासह मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. इंझोरी परिसरात नदीकाठची शेतजमिन पिकांसह खरडून गेली.इंझोरी : २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान इंझोरी परिसरात परतीचा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारासदेखील जोरदार पाऊस झाल्याने इंझोरी परिसरातील नदी, नाले वाहते झाले. पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुनिता राठोड, बाळू राठोड, मधु काळेकर, देवानंद हळदे, मंगेश काळेकर, मधुकर हळदे, गजानन राठोड, भीमराव राठोड, कुंदन श्यामसुंदर, शमीन शहा, रूख्मिना पुंड, गणेश ढोरे, आनंद तोतला, युवराज वाघमारे, धनराज वाघमारे, पंजाब वाघमारे यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर अन्य शेतकºयांच्या शेतातील पिकांत पाणी साचले. विमा कंपनी व महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मोहरी : २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान तसेच २६ सप्टेंबरलादेखील जोरदार पाऊस झाला. या पावसाने उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे मोहरी परिसरातील नदी नाले व मोहरी येथील धरण पुर्ण भरले आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.मालेगाव : २६ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास परतीचा पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात मुख्यत्वेकरून मारसुळ भागात शेंगाचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असताना गत तीन, चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळा पडत असून त्याला काही ठिकाणी कोंब बाहेर येत आहे. पावसामुळे सात एकरातील सोयाबीनच्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहेत, असे मारसूळ येथील शेतकरी श्यामराव घुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी शेतात असेल तर ते पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे सोयाबीनला कोंब येणार नाहीत. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार असल्यास पंचनामे केले जातील.-शशिकिरण जांभरूनकर,तालुका कृषी अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस