शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:33 IST

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २५ व २६ सप्टेंबर रोजीच्या परतीच्या पावसामुळे मारसूळ, इंझोरी, मोहरी यासह मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. इंझोरी परिसरात नदीकाठची शेतजमिन पिकांसह खरडून गेली.इंझोरी : २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान इंझोरी परिसरात परतीचा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारासदेखील जोरदार पाऊस झाल्याने इंझोरी परिसरातील नदी, नाले वाहते झाले. पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुनिता राठोड, बाळू राठोड, मधु काळेकर, देवानंद हळदे, मंगेश काळेकर, मधुकर हळदे, गजानन राठोड, भीमराव राठोड, कुंदन श्यामसुंदर, शमीन शहा, रूख्मिना पुंड, गणेश ढोरे, आनंद तोतला, युवराज वाघमारे, धनराज वाघमारे, पंजाब वाघमारे यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर अन्य शेतकºयांच्या शेतातील पिकांत पाणी साचले. विमा कंपनी व महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मोहरी : २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान तसेच २६ सप्टेंबरलादेखील जोरदार पाऊस झाला. या पावसाने उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे मोहरी परिसरातील नदी नाले व मोहरी येथील धरण पुर्ण भरले आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.मालेगाव : २६ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास परतीचा पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात मुख्यत्वेकरून मारसुळ भागात शेंगाचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असताना गत तीन, चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळा पडत असून त्याला काही ठिकाणी कोंब बाहेर येत आहे. पावसामुळे सात एकरातील सोयाबीनच्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहेत, असे मारसूळ येथील शेतकरी श्यामराव घुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी शेतात असेल तर ते पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे सोयाबीनला कोंब येणार नाहीत. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार असल्यास पंचनामे केले जातील.-शशिकिरण जांभरूनकर,तालुका कृषी अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस