शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:33 IST

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २५ व २६ सप्टेंबर रोजीच्या परतीच्या पावसामुळे मारसूळ, इंझोरी, मोहरी यासह मानोरा तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. इंझोरी परिसरात नदीकाठची शेतजमिन पिकांसह खरडून गेली.इंझोरी : २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतादरम्यान इंझोरी परिसरात परतीचा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारासदेखील जोरदार पाऊस झाल्याने इंझोरी परिसरातील नदी, नाले वाहते झाले. पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुनिता राठोड, बाळू राठोड, मधु काळेकर, देवानंद हळदे, मंगेश काळेकर, मधुकर हळदे, गजानन राठोड, भीमराव राठोड, कुंदन श्यामसुंदर, शमीन शहा, रूख्मिना पुंड, गणेश ढोरे, आनंद तोतला, युवराज वाघमारे, धनराज वाघमारे, पंजाब वाघमारे यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर अन्य शेतकºयांच्या शेतातील पिकांत पाणी साचले. विमा कंपनी व महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मोहरी : २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान तसेच २६ सप्टेंबरलादेखील जोरदार पाऊस झाला. या पावसाने उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे मोहरी परिसरातील नदी नाले व मोहरी येथील धरण पुर्ण भरले आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत.मालेगाव : २६ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास परतीचा पाऊस सुद्धा बरसत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात मुख्यत्वेकरून मारसुळ भागात शेंगाचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असताना गत तीन, चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळा पडत असून त्याला काही ठिकाणी कोंब बाहेर येत आहे. पावसामुळे सात एकरातील सोयाबीनच्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहेत, असे मारसूळ येथील शेतकरी श्यामराव घुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी शेतात असेल तर ते पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे सोयाबीनला कोंब येणार नाहीत. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार असल्यास पंचनामे केले जातील.-शशिकिरण जांभरूनकर,तालुका कृषी अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस