शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:41 IST

वाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव तसेच कोल्हापुरी ...

वाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन केल्यास शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी निधीची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील २१७ योजनांकरिता ५३.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे या पाचही जिल्ह्यांत एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी चंद्रकांत ठाकरे यांच्या मंत्रालयीन स्तरावरील स्नेहामुळे एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडित व्यवसाय आहे, परंतु जिल्ह्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अद्यापही जिल्ह्यात सिंचनाच्या उत्तम सोयी-सुविधा उपलब्घ नसल्याने शेती तोट्याची होत चालली आहे. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आजही शासन दरबारी मागास जिल्हा म्हणून वाशिम जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसण्यासाठी व जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी आपल्या संकल्पनेतून जिल्ह्यात सिंचनाची भरीव कामे केलीत. परंतु आजही सिंचन क्षेत्रात विविध विकासकामे करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच आहे. सद्य:स्थितीत जे प्रकल्प नादुरुस्त आहेत, मोडकळीस आलेले आहेत, पाण्याचा साठा कमी व गाळाचे प्रमाण अधिक आहे, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन अशा प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करून जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यास नक्कीच मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन सिंचन प्रकल्पांच्या विकासाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत शासनाने तातडीने २० जानेवारी २०२० रोजी शासन निर्णय काढून जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पासह सिंचन क्षेत्राच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर केला आहे. प्रथमच जिल्ह्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याची ही सोनेरी घटना आहे.

सिंचन, गाव तलाव व कोल्हापुरी बंधारे कात टाकणार

जिल्ह्यातील ८२ गावांतील नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या गाव तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असून पाणीटंचाईदेखील कमी होण्यास मदत मिळणार असून शेतकऱ्यांचे भाग्यही उजळणार आहे.

प्रचंड पाणीसाठा पुनर्स्थापित होणार

जिल्ह्यातील गाव तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्ती व देखभालीकरिता शासनाकडून ३६.९२ कोटींचा भरीव निधी प्राप्त झाला आहे. यामुळे कोरडवाहू शेतीचे प्रमाण घटणार आहे व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील गाव तलाव व बंधाऱ्यांची दुरुस्ती केल्यास पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होणार असून प्रचंड पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.

जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार

राज्यात मागास जिल्हा म्हणून वाशिमची ओळख आहे. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग प्रकल्प नाहीत. शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. परंतु जिल्ह्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेती डोईजड होत आहे. नवीन सिंचन प्रकल्प करणेही शक्य नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नादुरुस्त प्रकल्पांना नवसंजीवनी दिल्यास जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. शासनाकडूनदेखील जिल्ह्याच्या विकासाकरिता निधी मंजूर करण्यात आला. याबद्दल मी शासनाचा ऋणी असून जास्तीत जास्त निधी सरकारकडून खेचून आणून जिल्ह्याचा कायापालट करू व मागासलेपणाचा डाग पुसून टाकू, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली.

अ.क्र. तालुका गावांची संख्या अंदाजित रक्कम

१मालेगाव १७ ६१२.९८

२ मंगरुळपीर १५ ५७८.१७

३ मानोरा २० ८३९.१२

४रिसोड ११ ४९०.००

५वाशिम १० ४०८.००

६कारंजा १८ ६६४.१४