शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली

By दिनेश पठाडे | Updated: May 8, 2024 17:20 IST

शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबविली असून, आरटीई पोर्टलवर तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले.

वाशिम : सरकारी व खासगी अनुदानित शाळा एक किलोमीटरच्या परिसरात असल्यास विनाअनुदानित खासगी शाळांना आरटीई कायद्याच्या कोट्यातील प्रवेशातून सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यानंतर शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबविली असून, आरटीई पोर्टलवर तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले.

आरटीईअंतर्गत गोरगरीब, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र बालकांना स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश मिळावा म्हणून २५ टक्के जागा राखीव असतात. तथापि, शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये आरटीईच्या निकषांत बदल केले होते. नव्या बदलानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर अनुदानित, सरकारी शाळा उपलब्ध असल्यास स्वयंअर्थसाहाय्यित खासगी शाळा संकेतस्थळावर दिसत नव्हती. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसेल तर आरटीई कायद्याचा काय उपयोग ? असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात होता. सरकारी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्जाचा खटाटोप कशाला, यामुळे आरटीई प्रवेश अर्जाकडे पालकांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र होते.

वाशिम जिल्ह्यात ९५० शाळांमधील राखीव असणाऱ्या १३ हजार ९८ अर्जांसाठी केवळ ४८८ जणांनी अर्ज केले होते. आरटीई सुधारणेस पालकांनी विरोध दर्शवून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने त्यास स्थगिती दिली. त्यावरुन आगामी शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असल्याचे पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया थांबविण्यात आल्यामुळे नवीन नियमावलीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

नवीन नियमावली तयार होणार

उच्च न्यायालयाने आरटीईच्या सुधारणास स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश अर्जाची प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे आता राज्य स्तरावर नवीन नियमावली तयार केली जात आहे. पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविली जाण्याचे चिन्हे आहेत. याबाबत नियमावली जारी झाल्यानंतर कळेल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण