शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:26 IST

कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड, निकृ ष्ट बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच जिल्ह्यात २२ जुलैपासून हजेरी लावलेल्या पावसाने अनेक भागांत तांडव करून पिकांसह शेतजमिनीचे नुकसान केले आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यास मात्र विलंब होत असल्याने शेतकरी व्यथीत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यात पाच जूनपासून पावसाने दडी मारली, तर १० जूनला काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. शिवाय २२ जूननंतर पावसाने अनेक भागांत ठाणच मांडले. याच कालावधित कारंजा तालुक्यातील धनज बु., रिसोड तालुक्यातील मोप, भर जहॉगिर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याने खरडल्या. वाशिम तालुक्यात दगड उमरा शिवारात अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतांत पाणी घुसले, तर मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात २८ जून रोजी पावसाने थैमान घालून शेतजमिनीचे नुकसान केले. त्यानंतर २ जुलै रोजी रात्री दोन तास पाऊस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसून पिकांसह शतजमिनी खरडून गेल्या. त्यात २८ जून रोजी आलेल्या मुसळधार पावसानंतर संबंधित तलाठ्यांनी मेडशी भाग १ आणि मेडशी भाग २ या शिवारात या नुकसानाची पाहणी केली. त्यात जवळपास २० हेक्टर क्षेत्रातील जमिनी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी तयार केला आहे. रिसोड तालुक्यातील मोप मंडळातही गत आठवड्यात जोरदार पाऊस पडला. त्यात नदी, नाल्या काठी असलेल्या बोरखेडी, पिंपरखेड, कन्हेरी, मोप, आसोला या पाच गावांत पावसाचे पाणी घुसल्याने शेकडो एकर शेतजमीनबाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे उपरोक्त पाच गावांत नेमके किती क्षेत्र बाधित झाले हे कळणे अशक्य आहे. आता तलाठ्यांकडून प्राप्त पंचनाम्याची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेती