शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:26 IST

कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड, निकृ ष्ट बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच जिल्ह्यात २२ जुलैपासून हजेरी लावलेल्या पावसाने अनेक भागांत तांडव करून पिकांसह शेतजमिनीचे नुकसान केले आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यास मात्र विलंब होत असल्याने शेतकरी व्यथीत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यात पाच जूनपासून पावसाने दडी मारली, तर १० जूनला काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. शिवाय २२ जूननंतर पावसाने अनेक भागांत ठाणच मांडले. याच कालावधित कारंजा तालुक्यातील धनज बु., रिसोड तालुक्यातील मोप, भर जहॉगिर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याने खरडल्या. वाशिम तालुक्यात दगड उमरा शिवारात अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतांत पाणी घुसले, तर मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात २८ जून रोजी पावसाने थैमान घालून शेतजमिनीचे नुकसान केले. त्यानंतर २ जुलै रोजी रात्री दोन तास पाऊस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसून पिकांसह शतजमिनी खरडून गेल्या. त्यात २८ जून रोजी आलेल्या मुसळधार पावसानंतर संबंधित तलाठ्यांनी मेडशी भाग १ आणि मेडशी भाग २ या शिवारात या नुकसानाची पाहणी केली. त्यात जवळपास २० हेक्टर क्षेत्रातील जमिनी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी तयार केला आहे. रिसोड तालुक्यातील मोप मंडळातही गत आठवड्यात जोरदार पाऊस पडला. त्यात नदी, नाल्या काठी असलेल्या बोरखेडी, पिंपरखेड, कन्हेरी, मोप, आसोला या पाच गावांत पावसाचे पाणी घुसल्याने शेकडो एकर शेतजमीनबाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे उपरोक्त पाच गावांत नेमके किती क्षेत्र बाधित झाले हे कळणे अशक्य आहे. आता तलाठ्यांकडून प्राप्त पंचनाम्याची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेती