शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:26 IST

कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड, निकृ ष्ट बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच जिल्ह्यात २२ जुलैपासून हजेरी लावलेल्या पावसाने अनेक भागांत तांडव करून पिकांसह शेतजमिनीचे नुकसान केले आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यास मात्र विलंब होत असल्याने शेतकरी व्यथीत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यात पाच जूनपासून पावसाने दडी मारली, तर १० जूनला काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. शिवाय २२ जूननंतर पावसाने अनेक भागांत ठाणच मांडले. याच कालावधित कारंजा तालुक्यातील धनज बु., रिसोड तालुक्यातील मोप, भर जहॉगिर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याने खरडल्या. वाशिम तालुक्यात दगड उमरा शिवारात अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतांत पाणी घुसले, तर मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात २८ जून रोजी पावसाने थैमान घालून शेतजमिनीचे नुकसान केले. त्यानंतर २ जुलै रोजी रात्री दोन तास पाऊस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसून पिकांसह शतजमिनी खरडून गेल्या. त्यात २८ जून रोजी आलेल्या मुसळधार पावसानंतर संबंधित तलाठ्यांनी मेडशी भाग १ आणि मेडशी भाग २ या शिवारात या नुकसानाची पाहणी केली. त्यात जवळपास २० हेक्टर क्षेत्रातील जमिनी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी तयार केला आहे. रिसोड तालुक्यातील मोप मंडळातही गत आठवड्यात जोरदार पाऊस पडला. त्यात नदी, नाल्या काठी असलेल्या बोरखेडी, पिंपरखेड, कन्हेरी, मोप, आसोला या पाच गावांत पावसाचे पाणी घुसल्याने शेकडो एकर शेतजमीनबाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे उपरोक्त पाच गावांत नेमके किती क्षेत्र बाधित झाले हे कळणे अशक्य आहे. आता तलाठ्यांकडून प्राप्त पंचनाम्याची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेती