शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

वाशिम : संभाव्य तिसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज होणे आवश्यक असून, ऑक्सिजन, औषधीचा पुरेसा साठा ...

वाशिम : संभाव्य तिसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज होणे आवश्यक असून, ऑक्सिजन, औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर यांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, शासकीय व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्याची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. विशेषतः ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. सुदैवाने जिल्ह्यात उभा राहत असलेल्या शासकीय व खासगी ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. तरीही प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा, सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटिलेटर यासह इतर उपकरणे व मनुष्यबळ याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार सज्जता ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. दुसऱ्या लाटेदरम्यानची एकाच दिवशीची सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

००००००००००

प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक असून, जिल्ह्यात कोणत्याही गावात अथवा परिसरात कोरोना बाधितांची वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. तेथील लसीकरण वाढवून बाधितांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करावे. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सुद्धा या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.