शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
2
खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर
3
बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात
4
अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले
5
अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित
6
चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट, काय आहे नेमकं कारण?
7
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
8
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
9
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
10
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
11
Retirement Planning: रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा
12
"मला बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते", अदिती सारंगधरने सांगितला प्रेग्नंन्सी काळातील अनुभव
13
Share Market Open : आधी घसरण, मग तेजी; सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये; विप्रो वधारला, हिंदाल्को आपटला
14
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
15
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
16
धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास
17
Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
18
ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण
19
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
20
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!

रिसोड तालुक्यातील मुख्यालय, निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 2:08 PM

तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा मुख्यालय आणि निवासस्थानांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही.ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय-निमशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्र वेळेवर मिळावी, आरोग्य सेवा गावातच मिळावी यासाठी गावपातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावगाडा गावातूनच चालविणे आवश्यक आहे. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणचा कारभार पाहण्यासाठी अधिकारी जसे मुख्यालयी राहतात, त्याचप्रमाणे गावपातळीवरचा कारभार पाहणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे अपेक्षीत आहे. मुख्यालयी राहिल्यावरच गावच्या समस्या काय आहेत, याची चांगल्याप्रकारे माहिती मिळू शकते. मुख्यालयी राहणे शक्य नसेल तर किमान गावात नियमितपणे हजेरी लावून तक्रारींचे निराकरण करणे गावकºयांना अपेक्षीत आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. याची सर्वाधिक झळ तलाठी, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचाºयांना बसत आहे. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना इतरत्र बसून कामकाज पाहावे लागत आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होण्यासाठी व कर्मचाºयांना कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हक्काचे कार्यालय असणे आवश्यक आहे. कार्यालयाबरोबरच कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थानदेखील महत्त्वाचे आहे. एकिकडे गावपातळीवरील कर्मचाºयांनी मुख्यालयी राहावे, असे शासनाचा आदेश सांगतो. तर दुसरीकडे कर्मचाºयांना राहण्यासाठी मात्र निवासस्थानाची व्यवस्था केली जात नाही. निवासस्थानाअभावी कर्मचाºयांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो. कर्मचाºयांना आवश्यक सुविधायुक्त निवासस्थान उपलब्ध करून दिले पाहिजे. कर्मचाºयांना गावपातळीवर भेडसावणाºया समस्यांचा विचार करून त्यादृष्टीने सुविधा पुरविल्या पाहिजे. मुख्यालयी निवासस्थान आले तर बरेच कर्मचारी गावात राहू शकतील. या दृष्टिकोनातून विचार करून शासनाने गावपातळीवर कार्यालय आणि निवासस्थान उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तलाठी कार्यालयांसाठी निधी उपलब्ध नसल्याने सदर कार्यालयाच्या इमारतींचा प्रश्न निकाली निघू शकला नाही. हीच गत काही ग्राम पंचायत कार्यालयांची झाली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम