शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान टाळण्यासाठी हिरव्या उडिद पिकाची तोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 16:33 IST

उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा (वाशिम) : गेल्या आठ तेदहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने काढणीवर आलेले उडिदाचे पीक संकटात सापडले आहे. उडिदाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या असतानाही पावसामुळे झाडे हिरवीच असून, पावसामुळे काढणीच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या खर्चातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस विलंबाने दाखल झाला. त्याचा परिणाम उडिद, मुगाच्या क्षेत्रावर झाला. मुगाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ७९१ असताना केवळ ६३९० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली, तर उडिदाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ९२५ हेक्टर असताना केवळ ८३२८ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके कमी कालावधीची आणि शेतकºयांना आधार देणारी आहेत. आता ही पिके काढणीवर आली आहेत. पिकाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या आहेत. त्यामुळे त्या शेंगांची तोडणी करणे आवश्यक आहे. तथापि, सततच्या पावसामुळे उडिद, मुगाची झाडे अद्यापही हिरवीच आहेत. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतात शेंगा तोडणीचे काम करणे कठीण झाले आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातही गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. उडिद पिकाच्या शेंगा सुकल्या असल्या तरी पावसामुळे  पिकाचा पाला हिरवाकच्च आहे. आता शेंगा तोडल्या नाही, तर त्या पावसामुळे फुटण्याची, तसेच शेतमालाचा दर्जा खालावण्याची भिती आहे. त्यातच पावसामुळे उडिदाच्या पिकाची सोंगणी अशक्य असल्याने शेतकरी झाडे उपटून रस्त्यावर बसून शेंगा तोडणी करीत आहेत. हा प्रकार मोठा खर्चिक असल्याने उडिद उत्पादक शेतकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. तथापि, नुकसान टाळण्यासाठी हा प्रकार करण्याशिवाय शेतकºयांकडे पर्यायही उरलेला नाही. 

उडिदाचे पिक काढणीला आले  पावसामुळे पाला हिरवा तर शेंगा वाळलेल्या आहेत त्यामुळे सोंगणी अशक्य आहे  हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून मजुरा व्दारा झाडे उपटून रोडवर शेंगा तोडणी करावी  लागत आहे मजुरीचा खर्च परवडणारा नाही उडीद पेरुन पश्र्चाताप होत आहे.-संजय श्रीराम चव्हाण शेतकरी सुदी (मालेगाव)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी