शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पावसाळा अर्ध्यावर; प्रकल्प तहानेलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 10:59 IST

Washim News : जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाचा पावसाळा अर्ध्यावर आला असून, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पाऊसही पडला आहे. तथापि, अद्याप जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असून, त्या ३ प्रकल्पांत ४८.४६ टक्के जलसाठा झाला आहे.जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघु प्रकल्प मिळून एकूण १३७ प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे यातील ९५ टक्के प्रकल्प काठोकाठ भरले होते. यंदाही जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलैच्या सुरुवातीला पावसाने दिलेला खंड वगळता दमदार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे आजवरचे पावसाचे प्रमाणही जून, जुलैमधील सरासरीपेक्षा खूप अधिक असून, १ जून ते १५ जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत मोठी वाढ अपेक्षित होती. परंतु अद्याप जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी केवळ ३०.४८ टक्के साठा झाला आहे. आता पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जोरदार पाऊस न पडल्यास यंदा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी निम्म्यापर्यंतही पोहोचण्याची शक्यता कमीच राहणार आहे.  

दोन लघु प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाच्या आणि कारंजा तालुक्यातील वडगांव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील केवळ हे दोनच प्रकल्प अर्ध्या पावसाळ्यापूर्वीच शंभर टक्के भरले असून, या दोन्ही प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्गही होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडत आहे. 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRainपाऊस