शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

शेतकऱ्यांनी धरली भुईमूग शेतीची कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

शेलूबाजार : नांदखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने भुईमूग शेतीकडे वळले असून, यंदा ३०० ते ३५० एकरावर भुईमुगाचा पेरा ...

शेलूबाजार : नांदखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने भुईमूग शेतीकडे वळले असून, यंदा ३०० ते ३५० एकरावर भुईमुगाचा पेरा होता. सर्वाधिक भुईमूग उत्पन्न घेणाऱ्या बटईदारांचा सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाच्यावतीने रविवारी सत्कार करण्यात आला.

नांदखेडा येथील सिंचन तलावामुळे मे महिन्यातसुध्दा शेतशिवार हिरवागार शालू पांघरून असल्याचे दिसून येते. माजी सरपंच लक्ष्मणराव जायभाये यांनी दूरदृष्टीकोनातून उभारलेला सिंचन तलाव गावाच्या प्रगतीची भाग्यरेखा ठरला आहे. यावर्षी नांदखेडा गावात ३०० ते ३५० एकरावर भुईमूग पेरा होता. दर महिन्याला बदलणाऱ्या वातावरणामुळे भुईमूग उत्पादनात घट झाल्याचे जिल्हाभरात पाहावयाला मिळते. याही गावात सरासरी उत्पादनात घट आली आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील शेतकरी पांडुरंग जायभाये यांचे बटईदार मुस्तकिन शहा, विनोद जामभाये, नीलेश जायभाये या तरुणांनी पाण्याच्या पाळीचे योग्य नियोजन, रात्रीची फवारणी, कल्पकतेने डवरा पास लावून भर घालणे व तणमुक्त शेती या प्रयत्नातून जिद्द, मेहनत, चिकाटी, कल्पकता व प्रामाणिक प्रयत्न याच पंचसुत्राने नैसर्गिक संकटावरसुध्दा मात करून २० एकरात सरासरी १३ ते १५.५ क्विंटल उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भुईमूग पिकाला पेरणी ते काढणीपर्यंत एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्या बटईदारांच्या मेहनतीचा कुठेतरी सन्मान व्हावा, याच सद्हेतूने नांदखेडा येथील सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाचे अध्यक्ष जावेद शहा जमील शहा या युवकांच्या कल्पनेतून बटईदारांचा सत्कार ही आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शेख जिल्हानी होते, तर प्रमुख अतिथी सरपंच सचिन जायभाये, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर जायभाये, ग्रामपंचायत सदस्य शेख अकील, प्रा. गौतम सिरसाठ, शेख अनिस, निवास घुगे, हामिद खान, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ लठाड, पांडुरंग जायभाये, आशिद खान, शेख इरफान, सादीक शहा हे होते. जावेद शहा यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन जायभाये यांनी आभार मानले.