शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:27 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींनी पावसाळ्यात जमिनीवर कोसळणाºया पाण्याचे संकलन व संचय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्रान्वये केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते, आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्या देशाला निसर्गाने पावसाचे पुरेसे पाणी दिले आहे. हे पाणी संकलित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले होते. दरम्यान, १७ जून रोजी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी जलसंधारणाच्या कामात हिरीरीने सहभाग नोंदविलेल्या जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्र्यांचे पत्र सुपूर्द करून पावसाच्या पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सोपविली. दरम्यान, यासंदर्भात २२ जून रोजी बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून सर्व ग्रामस्थांसमोर प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन केले. त्यानुसार पावसाच्या पाण्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी