शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:27 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींनी पावसाळ्यात जमिनीवर कोसळणाºया पाण्याचे संकलन व संचय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्रान्वये केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते, आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्या देशाला निसर्गाने पावसाचे पुरेसे पाणी दिले आहे. हे पाणी संकलित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले होते. दरम्यान, १७ जून रोजी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी जलसंधारणाच्या कामात हिरीरीने सहभाग नोंदविलेल्या जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्र्यांचे पत्र सुपूर्द करून पावसाच्या पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सोपविली. दरम्यान, यासंदर्भात २२ जून रोजी बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून सर्व ग्रामस्थांसमोर प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन केले. त्यानुसार पावसाच्या पाण्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी