ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन करावे तसेच साथरोग लक्षात घेता धूर फवारणी करावी-जनशक्ती प्रहारची मागणी
वार्ताहर
काजळेश्वर उपाध्ये : गत दोन दिवस आलेल्या संततधार पावसाने काजळेश्वर येथील अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून, रस्त्यावर तलावाचे रूप दिसत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन मोहीम हाती घेऊन साथरोग लक्षात घेता धूर फवारणी करावी अशी मागणी प्रहार
जनशक्ती संघटनेने केली आहे.
वृत्त असे की, गत सोमवार, मंगळवारला काजळेश्वर येथे संततधार पाऊस आला. या पावसाने
उमा नदीला महापूर आला. नदी,नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले. तर गावात ठिकठिकाणी पाणी तुंबले.पाणी वाहून न गेल्याने काही काळ तेथे पूरसदृशस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात गोठ्यात पाणी घुसले. काहींच्या घराच्या भिंती पडल्यात त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. पाणी व्यवस्थापन कार्य ग्रामपंचायतीने हाती घेऊन गावात पाणी तुंबू नये, रोडच्या नाल्याचे काम हाती घ्यावे तसेच सततच्या पावसाने मच्छराचा कहर सुरू झाला त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे साथरोग
सुरु झाले तेव्हा गावात ग्रामपंचायत प्रशासनाने धूर फवारणी करावी अशी मागणी जनशक्ती प्रहार संघटनेचे सेवक प्रदीप उपाध्ये,महादेव जाधव, सोनुभाई आदींनी केली आहे.