शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:31 IST

ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  खारपाणपट्ट्यासह अनेक गावांचा कायापालट करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने आणली आहे. ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. कृषी विभागाच्यावतीने  आयोजित ग्राम वडगाव (इजारा), सोहळ, शेलुवाडा तसेच वाई येथे  कृषी संजीवनी प्रकल्प रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, जिल्हा कृषी अधीक्षक गवसाने, तालुका कृषी अधिकारी वाळके यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   जिल्ह्यात १४९ गावांचा समावेश असुन यामध्ये कारंजा ३३, मानोरा ३९, मालेगाव १७, मंगरूळपीर २२, रिसोड १८ तर वाशिम येथील २० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  योजनेच्या माध्यमातून खारपाणपट्ट्यासह गावांचा कायापालट होणार असुन गावासाठी भरीव योगदान देण्याची संधी ग्रामपंचायत व गावाला मिळाली आहे, त्यासाठी योगदान द्यावे. शेतीला जोड म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन असा पूरक व्यवसाय आवश्यक आहे. कृषी सहाय्यक यांनी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन आ.पाटणी यांनी केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रकल्पाचे महत्व ग्रामस्थांना पटवुन सांगितले. या योजनेत ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असुन सरपंच समितीचे अध्यक्ष तर ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. गावाचे सूक्ष्म नियोजन करून चांगला आराखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ग्राम वाई येथे ओमप्रकाश तापडीया, शारदाताई मनवर, अशोक पाटील ठाकरे, मुसाभाई, साहेबराव ठाकरे, दिनेश मनवर, बेबीताई मनवर, मनिषा उजवणे तर शेलुवाडा येथे सरपंच गोपाल काळे, अमोल जयस्वाल, योगेश जयस्वाल, बाबाराव मसके, दिगांबर जिरे, किसनराव भगत, विनायक देशमुख, धोंडबा जिरे तसेच वडगाव इजारा येथे सरपंच किशोर जाधव,  जि.प.सदस्य मोहन महाराज, संजय जाधव, रमेश राठोड, चंदु जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीFarmerशेतकरी