शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१० विहीरीचे पाणी जमा करुन केली पाणी टंचाईवर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:32 IST

गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे.

वाशिम : गावातील ग्रामीण पाणी पुरवठ्याचा पाण्याचा स्त्रोत आटल्याने खरोळा गाव भिषण पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेले असतांना गावाला पाणी टंचाई जाणवु देणार नाही या उद्देशाने खरोळा सरपंच दिपक खडसे यांनी सचिव विजय ठाकरे व सर्व ग्रा.पं.सदस्यांची भेट घेवुन चर्चा केली व १० विहिरींचे पाणी जमा करुन त्यावर मात मिळविली. संपूर्ण जिल्हयात त्यांच्या कार्याचे कौतूक होत आहे.गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले , परंतु यातही अनेक अडचणीला सामोर जावे लागले असतांना धिर न सोडता सरपंचांनी सर्व ग्रा.पं.पदाधिकारी घेवुन गावातील कांताबाई काळे, मिरु ठाकरे, महादेव हरिभाऊ ठाकरे, शिवाजी महाले, गजानन ठोंबे, विठ्ठल लाडके, संजय ठाकरे, श्रीराम ठाकरे, नंदु ठाकरे,वसंता महाले या सर्व शेतकºयांची भेट घेतली. गावावर असलेले पाणी संकटाची माहिती त्यांना दिली. यावरुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या विहीरीचे पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी मोफत देण्याचे मान्य केले. यावरुन त्यांनी गावातील शेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . पाईप अपुरे पडत असल्याने पाईपाची दररोज उचलखाचल करुन दुसºया विहीरीवर टाकण्याचे काम सुध्दा गावकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केले. हे करीत असतांना अतिशय त्रास सुध्दा सहन करावा लागला मात्र कोणीही माघार घेतली नाही. यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. नागरीकांच्या पाणी टंचाईच्या झळा स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीsarpanchसरपंच