शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित!

By admin | Updated: March 30, 2017 02:44 IST

२0१२ पासून मिळाली नाही रक्कम; शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

वाशिम, दि. २९- शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून विविध स्वरूपात शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यात यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. मात्र, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सुमारे चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले असताना त्यांना कुठल्याच प्रकारचे अर्थसहाय्य शासन स्तरावरून झालेले नाही.पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जायची. त्यात गतवर्षीपासून बदल होत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी ही परीक्षा घेतली जाते. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता इयत्ता आठवीमध्ये एनएमएमएस नावाची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) ही देखील शिष्यवृत्तीचीच परीक्षा असून, ती दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांंकरिता आयोजित केली जाते. तथापि, सन २0१२ पासून या तीनही प्रकारच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. संबंधित विद्यार्थ्यांंना शासनाच्या ध्येय-धोरणानुसार देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना शासन स्तरावरून एकाही विद्यार्थ्यास गेल्या पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या या परीक्षा केवळ तकलादू ठरत असून, विद्यार्थी, पालकांसोबतच शाळांच्या मुख्याध्यापकांचीदेखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे.