शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:52 IST

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी वाशिममध्ये वास्तव्यास असलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगारांना आपापल्या घरी परतायचे आहे; मात्र रेल्वेचा प्रवास सद्या बंद आहे; तर एस.टी. बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. या नियमामुळे हजारो नागरिक जिल्ह्यात अडकले आहेत.नियमबाह्य पद्धतीने ट्रकसह अन्य वाहनांमधून परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून प्रवास करित असलेल्या सुमारे दीड हजार मजूरांना काही दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ठेवल्यानंतर प्रशासनाने विशेष रेल्वे, खासगी वाहनांनी त्या-त्या राज्याच्या सिमा व राज्यातील जिल्ह्यांमध्ये संबंधितांना रवाना केले. आता शासनाने एस.टी. परिवहन महामंडळाच्या बसमार्फत प्रवासी सेवा देखील उपलब्ध करून दिली; परंतु त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात थेट जाणार असून मधे कुठेही थांबणार नाही. यासह सुरक्षिततेच्या कारणास्तव बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी बसविले जाणार नाहीत किंवा त्यापेक्षा कमी असतील तरी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार नाही.तथापि, वाशिम जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागात परराज्य व अन्य जिल्ह्यांमधील अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार वास्तव्यास आहेत; मात्र एकाच जिल्ह्यात किंवा एकाच राज्यात जाणाºया २२ प्रवाशांच्या एकाही गटाने अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पास मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. एस.टी. परिवहन महामंडळाची बससेवा एकाच राज्याच्या सिमेवर किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध असणार आहे. त्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासोबतच २२ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. या नियमात बसणाऱ्यांनी प्रशासनाकडून पास मिळविण्याकरिता रितसर आॅनलाईन अर्ज केल्यास संबंधितांना परवानगी देण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी