शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:52 IST

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी वाशिममध्ये वास्तव्यास असलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगारांना आपापल्या घरी परतायचे आहे; मात्र रेल्वेचा प्रवास सद्या बंद आहे; तर एस.टी. बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. या नियमामुळे हजारो नागरिक जिल्ह्यात अडकले आहेत.नियमबाह्य पद्धतीने ट्रकसह अन्य वाहनांमधून परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून प्रवास करित असलेल्या सुमारे दीड हजार मजूरांना काही दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ठेवल्यानंतर प्रशासनाने विशेष रेल्वे, खासगी वाहनांनी त्या-त्या राज्याच्या सिमा व राज्यातील जिल्ह्यांमध्ये संबंधितांना रवाना केले. आता शासनाने एस.टी. परिवहन महामंडळाच्या बसमार्फत प्रवासी सेवा देखील उपलब्ध करून दिली; परंतु त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात थेट जाणार असून मधे कुठेही थांबणार नाही. यासह सुरक्षिततेच्या कारणास्तव बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी बसविले जाणार नाहीत किंवा त्यापेक्षा कमी असतील तरी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार नाही.तथापि, वाशिम जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागात परराज्य व अन्य जिल्ह्यांमधील अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार वास्तव्यास आहेत; मात्र एकाच जिल्ह्यात किंवा एकाच राज्यात जाणाºया २२ प्रवाशांच्या एकाही गटाने अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पास मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. एस.टी. परिवहन महामंडळाची बससेवा एकाच राज्याच्या सिमेवर किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध असणार आहे. त्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासोबतच २२ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. या नियमात बसणाऱ्यांनी प्रशासनाकडून पास मिळविण्याकरिता रितसर आॅनलाईन अर्ज केल्यास संबंधितांना परवानगी देण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी