शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मंगरुळपीर : दिव्यांग सेवा समितीचे अन्नत्याग आंदोलन दुस-या दिवशीही सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:08 IST

मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय, हक्क व  अधिकारासाठी सतत लढा देणा-या दिव्यांग सेवा समितीच्यावतीने सोमवार २२ जानेवारीपासून दिव्यांग, शेतमजुर, विधवा, भुमिहिन, कलावंत यांच्या जिवनावश्यक मागण्यासाठी मंगरुळपीर  तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत दिव्यांग सेवा समितीने मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविल्यानंतर प्रशासनाला सुचनाही देण्यात आल्या आहेत; परंतु आंदोलनाच दुसºया दिवशी २३ जानेवारीलाही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.

ठळक मुद्दे२२ जानेवारीपासून विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारले आंदोलन आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला तरिही प्रशासनाचे दुर्लक्ष प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मोबीसींग राठोड करणार जलत्याग 

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय, हक्क व  अधिकारासाठी सतत लढा देणा-या दिव्यांग सेवा समितीच्यावतीने सोमवार २२ जानेवारीपासून दिव्यांग, शेतमजुर, विधवा, भुमिहिन, कलावंत यांच्या जिवनावश्यक मागण्यासाठी मंगरुळपीर  तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत दिव्यांग सेवा समितीने मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविल्यानंतर प्रशासनाला सुचनाही देण्यात आल्या आहेत; परंतु आंदोलनाच दुसºया दिवशी २३ जानेवारीलाही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. . राज्य शासनाने वंचित व   दुर्बल घटकांसाठी विविध योजना अंमलात आनलेल्या आहेत; परंतु या योजनांत खोटी प्रकरणे करुन त्याचा लाभ सक्षम व्यक्ती घेत आहेत, याच प्रकरणाबाबत हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष  मोबीसींग राठोड यांनी सांगितले आहे. दरम्यान, दिव्यांग सेवा समितीने शासन दरबारी केलेल्या मागण्यांत  प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांग, विधवा, शेतमजुर, भूमिहीन कामगार यांना विनाअट समाविष्ट करावे, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाना तालुका स्तरावर अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात यावे,  नगर परिषद व ग्रामपंचायतीमधील दिव्यांगांचा राखिव निधी त्वरीत वितरीत करावा, कलावंताना ३ हजार रु. मासिक मानधन द्यावे, संजय गाधी व श्रावणबाळ योजनेचे बंद झालेले पात्र लाभाथार्चे मानधन सुरु करावे, दिव्यांग, विधवा यांना पिवळे राशन कार्ड देण्यात यावे, आदि मागण्यांचा समावेश असून,  शासनाने या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्यास २५ जानेवारीपासून जलत्याग करणार असल्याचा इशारा मोबीसींग राठोड यांनी  लेखी निवेदनाद्वारे २३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.र्  देण्यात यावे, आदि मागण्यांचा समावेश असून,  शासनाने या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्यास २५ जानेवारीपासून जलत्याग करणार असल्याचा इशारा मोबीसींग राठोड यांनी  लेखी निवेदनाद्वारे २३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन