शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह

By संतोष वानखडे | Updated: October 30, 2023 17:02 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

वाशिम : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून, ३० ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातही मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ काही गावांत नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक झळकले होते. आता वाशिम येथे सोमवार, ३० ऑक्टोबरपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरूवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, मनोज जरांगे - पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राम पाटील डोरले यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देवून आपला पाठिंबा दर्शविला.

आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार -मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे समाजबांधवांना अपेक्षीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या पहिल्या आंदोलनाची सांगता करताना, सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी करतानाच आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणwashimवाशिम